कॅन्सर हा शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते. आता पुर्वीप्रमाणे हा आजार जीवघेणा राहिलेला नाही. लवकर तो निदर्शनास आला तर लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येतात आणि या आजारातून पुर्णपणे बाहेरही पडता येते. पण तरीही प्रत्येकाच्याच मनात या आजाराविषयी प्रचंड भीती आहे. हा आजार आपल्याला होऊच नये असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायलाच हवेत. निरोगी जीवनशैली आपल्याला कॅन्सरपासून दूर ठेवू शकते, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. म्हणूनच आता आपण असे काही पदार्थ पाहूया जे पदार्थ कॅन्सर होण्याचा धोका कमी करू शकतात. त्यामुळे ते पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे.
कॅन्सरचा धोका कमी करणारे पदार्थ कोणते?
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ नियमितपणे असायला हवे, असा काेणताच पदार्थ नाही, जो खाल्ल्याने आपल्याला कॅन्सर होणारच नाही, याची पुर्ण हमी मिळेल. पण काही पदार्थ निश्चितच असे आहेत की जे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील. ॲण्टीऑक्सिडंट्स असणारे फळं, भाज्या, सुकामेवा आपल्या आहारात योग्य प्रमाणात असायला हवा.
तसेच ब्रोकोली, पत्ताकोबी अशा व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असणाऱ्या भाज्या, टोमॅटो, गाजर अशा लाल भाज्या, कांदा, लसणू असे पांढरे पदार्थ, वांगं, ब्लूबेरी, मनुका असे निळे, जांभळे पदार्थ खावेत.
जेवढे रंगबेरंगी पदार्थ आपल्या आहारात असतील तेवढे आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात. कॅन्सर होऊ नये म्हणून असं कोणतंही सुपरफूड नाही. पण सगळेच पौष्टिक पदार्थ थोडे थोडे आपण नियमितपणे खात गेलो तर त्याचा शरीरावर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो.
(सोशल मीडियावरून साभार)
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…