आरोग्य

कॅन्सरचा धोका कमी करणारे ‘हे’ पदार्थ रोज खायलाच हवेत

कॅन्सर हा शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते. आता पुर्वीप्रमाणे हा आजार जीवघेणा राहिलेला नाही. लवकर तो निदर्शनास आला तर लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येतात आणि या आजारातून पुर्णपणे बाहेरही पडता येते. पण तरीही प्रत्येकाच्याच मनात या आजाराविषयी प्रचंड भीती आहे. हा आजार आपल्याला होऊच नये असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायलाच हवेत. निरोगी जीवनशैली आपल्याला कॅन्सरपासून दूर ठेवू शकते, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. म्हणूनच आता आपण असे काही पदार्थ पाहूया जे पदार्थ कॅन्सर होण्याचा धोका कमी करू शकतात. त्यामुळे ते पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे.

कॅन्सरचा धोका कमी करणारे पदार्थ कोणते?

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणते पदार्थ नियमितपणे असायला हवे, असा काेणताच पदार्थ नाही, जो खाल्ल्याने आपल्याला कॅन्सर होणारच नाही, याची पुर्ण हमी मिळेल. पण काही पदार्थ निश्चितच असे आहेत की जे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील. ॲण्टीऑक्सिडंट्स असणारे फळं, भाज्या, सुकामेवा आपल्या आहारात योग्य प्रमाणात असायला हवा.

तसेच ब्रोकोली, पत्ताकोबी अशा व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असणाऱ्या भाज्या, टोमॅटो, गाजर अशा लाल भाज्या, कांदा, लसणू असे पांढरे पदार्थ, वांगं, ब्लूबेरी, मनुका असे निळे, जांभळे पदार्थ खावेत.

जेवढे रंगबेरंगी पदार्थ आपल्या आहारात असतील तेवढे आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात. कॅन्सर होऊ नये म्हणून असं कोणतंही सुपरफूड नाही. पण सगळेच पौष्टिक पदार्थ थोडे थोडे आपण नियमितपणे खात गेलो तर त्याचा शरीरावर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदत

मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत राज्य…

8 तास ago

पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्जाची मुदत ६ जुलैपर्यंत वाढली.

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत…

8 तास ago

महापुरुषांच्या साहित्याच्या पुनर्मुद्रणाला गती; संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीवर भर; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी…

10 तास ago

हरित इंधन की महागडा प्रयोग? नागरिकांच्या खिशाची जबाबदारी कोणाची?

मुंबई: देशाला हरित ऊर्जा हवी, पर्यावरणाचे संरक्षण झाले पाहिजे आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी झाले…

10 तास ago

शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके…

11 तास ago

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी…

13 तास ago