आपल्याला माहितीच आहे की आपली प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदललेली आहे. त्याचा परिणाम साहजिकच आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळेच हल्ली कमी वयातच हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार मागे लागत आहे. टाईप २ प्रकारचा मधुमेह तर भारतामध्ये खूप जास्त वाढताना दिसतो आहे. पुर्वी वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतरच हा आजार मागे लागायचा. पण आता मात्र खूप कमी वयात डायबिटीस झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी आपण नेहमीच करतो अशा काही गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आणि डायबिटीस होऊ नये म्हणून स्वत:ला कशा पद्धतीने जपणं गरजेचं आहे
‘या’ चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो..
१) जंकफूड खाण्याचे खूप जास्त वाढलेले प्रमाण हे देखील मधुमेह होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण जंकफूडच्या अतिसेवनामुळे शरीरात योग्य त्या प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही.
२) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण व्यायाम करायला टाळाटाळ करतात. आपण तर अजून तरुण आहे, आपल्याला व्यायामाची काय गरज असा अनेकांचा समज असतो. हा ॲटीट्यूड बदलायला हवा. डायबिटीजसारखे आजार कमी वयातच नको असतील तर नियमितपणे कोणता ना कोणता व्यायाम जरूर करा.
३) काही लोकांना कमी वयात डायबिटीस होण्यामागे अनुवंशिकता हे देखील कारण आहे. त्यामुळे आपल्या कुटूंबाचा मधुमेहाचा इतिहास व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानुसार आतापासूनच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करा.
४) मनावर सतत कोणता ना कोणता तणाव असणे हे देखील कमी वयात मधुमेह होण्याचे एक कारण आहे. हल्ली तरुण लोकांना कामाचा, त्यांच्या करिअरचा बराच ताण असतो. या ताणाचा परिणाम रात्रीच्या झोपेवर, आरोग्यावर होतो. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळेही मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
५) नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे अनेक जण टाळतात. बऱ्याचदा आपलं शरीर आपल्याला प्रीडायबेटीक अवस्थेची लक्षणं दाखवून देत असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग काही दिवसांतच बरेच लोक प्री डायबेटीक अवस्थेतून डायबेटीक अवस्थेत जातात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…