आरोग्य

आपल्या ‘या’ चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो

आपल्याला माहितीच आहे की आपली प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदललेली आहे. त्याचा परिणाम साहजिकच आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळेच हल्ली कमी वयातच हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार मागे लागत आहे. टाईप २ प्रकारचा मधुमेह तर भारतामध्ये खूप जास्त वाढताना दिसतो आहे. पुर्वी वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतरच हा आजार मागे लागायचा. पण आता मात्र खूप कमी वयात डायबिटीस झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी आपण नेहमीच करतो अशा काही गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आणि डायबिटीस होऊ नये म्हणून स्वत:ला कशा पद्धतीने जपणं गरजेचं आहे

‘या’ चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो..

१) जंकफूड खाण्याचे खूप जास्त वाढलेले प्रमाण हे देखील मधुमेह होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण जंकफूडच्या अतिसेवनामुळे शरीरात योग्य त्या प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही.

२) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण व्यायाम करायला टाळाटाळ करतात. आपण तर अजून तरुण आहे, आपल्याला व्यायामाची काय गरज असा अनेकांचा समज असतो. हा ॲटीट्यूड बदलायला हवा. डायबिटीजसारखे आजार कमी वयातच नको असतील तर नियमितपणे कोणता ना कोणता व्यायाम जरूर करा.

३) काही लोकांना कमी वयात डायबिटीस होण्यामागे अनुवंशिकता हे देखील कारण आहे. त्यामुळे आपल्या कुटूंबाचा मधुमेहाचा इतिहास व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानुसार आतापासूनच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करा.

४) मनावर सतत कोणता ना कोणता तणाव असणे हे देखील कमी वयात मधुमेह होण्याचे एक कारण आहे. हल्ली तरुण लोकांना कामाचा, त्यांच्या करिअरचा बराच ताण असतो. या ताणाचा परिणाम रात्रीच्या झोपेवर, आरोग्यावर होतो. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळेही मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

५) नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे अनेक जण टाळतात. बऱ्याचदा आपलं शरीर आपल्याला प्रीडायबेटीक अवस्थेची लक्षणं दाखवून देत असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग काही दिवसांतच बरेच लोक प्री डायबेटीक अवस्थेतून डायबेटीक अवस्थेत जातात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

17 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

17 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

21 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

21 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

21 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

22 तास ago