आरोग्य

लहान बाळांचा आहार कसा असावा…

आहाराचे संस्कार घरातूनच

लहान मुलांच्या आहाराबाबत सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्यांची आहाराची बदलती गरज. वाढत्या वयानुसार आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण वाढत जातं. त्यांच्यावर आहाराचे संस्कार घरातूनच सुरू होतात. एखाद्या पदार्थाची निवड, आहारातील वेगेवेगळे समज- गैरसमज यांची सुरुवात घरापासून होते, त्यामुळे पालक म्हणून आहाराबाबत सजग असणं आवश्यक असत.त्याला पालेभाज्या आवडतंच नाहीत.आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय त्याचं जेवणचं पूर्ण होत नाही”…ती फक्त भातच खाते. या लाडीक तक्रारीतून मुलांना बाहेर काढून सकस आहाराचं महत्त्व समजावणं आवश्यक असतं.

किडलेले दात…

लहान मुलांच्या आहारशैलीवर पालकांचा होणार परिणाम सांगताना आणखी एक किस्सा आठवतोय. २०२० साली सहा वर्षाच्या आद्याला तिचे पालक माझ्याकडे घेऊन आले होते. तिचे सगळे दात वेगेवेगळ्या रंगाचे होते. तिचे दुधाचे दात पूर्णपणे किडल्यामुळे दंतवैद्यानी सगळे दात काढून नवे रंगीत दात बसवून दिले होते. तिला पूर्णवेळ फक्त द्रव पदार्थ खाण्याची अटकळ असल्यामुळे तिचे पालक आहारात काय काय हवंय याचा सल्ला घेण्यासाठी आले होते. तिच्या दातांबद्दल सांगताना मिहीर त्रासून म्हणाला “कसं काय माहीत माझी कोक प्यायची सवय इतकी पटकन लागली तिला. पाण्याऐवजी फक्त कोक आणि पेप्सी इतकंच प्यायची, त्याने एवढं नुकसान होईल वाटलं नव्हतं.

सकस आहाराचं नियोजन…

मिहीर हे सांगताना आद्याच्या आईच्या- स्वातीच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. “तरी मी तुला सांगत होते. तिच्यासमोर कोक पेप्सी नको. पण माझं ऐकशील तर खरं. रोज चॉकलेट, जेवल्यानंतर चॉकलेट शेक, पाणी तर नकोच असतं तिला.” स्वाती नाराज स्वरात म्हणाली. आणि लहानखुरी आद्या… तिच्या विश्वात मात्र हे सगळंच नवीन होतं. आपले दात तर रंगीत आहेत, हे वेगळं आहे. पण नेमकं काय चुकलंय याबद्दलच निरागस कुतूहल होतं. तिच्या आहारातील बदल सुचवताना फक्त स्ट्रॉ वापरण्याचा सल्ला असल्यामुळे सकस आहाराचं नियोजन करणं थोडं आव्हानात्मक होतं.

वाढीसाठी पोषक आहार…

आद्याचं उदाहरण पाहता लहान मुलांच्या आहारात केवळ फॅड म्हणून नव्हे तर सवय म्हणून सकस आहाराची सुरुवात पालकांपासून व्हायला हवी, हे अधोरेखित होत राहतं. पाश्चात्त्य जीवनशैली अंगिकारताना आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थांबद्दल त्यांच्या आहारातील वापराबद्दल आपण आग्रही असायला हवं. लहान मुलांच्या वाढीसाठी पोषक आहार आवश्यक आहे, म्हणजे नेमकं कसं ते जाणून घेऊ.

वाढतं वजन हे परिमाण…

नवजात अर्भकाचा वजन पहिले ६ महिने ते एक वर्षापर्यंत वाढतं. या वयात पोषक तत्त्वांची आवश्यकता इतर कोणत्याही वयोगटापेक्षा अधिक असते. आईच्या दुधामधून आवश्यक संप्रेरके, प्रथिने यांचा पुरवठा होतोच . मात्र जेव्हा मूल हळूहळू अन्न पदार्थ खायला शिकतं, तेव्हा त्यांच्या आहारात कॅल्शिअम, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लोह, झिंक, व्हिटॅमिन्स (पोषणमूल्यं) आणि खनिजे यांचे प्रमाण उत्तम असणे आवश्यक असते. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढणे, हाडांची वाढ होणे, मेंदूला चालना मिळणे, ऊर्जेचा भरपूर पुरवठा होत राहणे, शरीरातील पेशींची वाढ उत्तम होणे आणि पेशींचे आरोग्य उत्तम राहणे यासाठी आहार महत्वाचा आहे. बाळाचे आरोग्य उत्तम असण्याचं एक परिमाण म्हणजे बाळाचं वाढतं वजन! पहिल्या सहा महिन्यात सरासरी ६ ते ८ किलो आणि एक वर्षापर्यंत सरासरी ११ किलोग्रॅम इतके वजन वाढणे अपेक्षित असते. अर्थात त्यासाठी आईचा आहारदेखील तितकाच महत्वाचा असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

2 तास ago

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…

2 तास ago

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…

3 तास ago

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…

3 तास ago

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…

3 तास ago

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…

3 तास ago