आरोग्य

पाणी प्यायल्यावर लगेच ‘ही’ लक्षणं दिसणं म्हणजे किडनी डॅमेजचे संकेत…

आजकाल भरपूर लोक किडनीसंबंधी आजारांचे शिकार होत आहेत. किडनीचा काही आजार झाला तर याची शरीरात काही लक्षणं दिसतात. पण कधी कधी काहीच लक्षणं दिसत नाहीत. अशात जेव्हा किडनीसंबंधी आजाराची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर किडनीसंबंधी आजार ओळखता येऊ शकतात. आज किडनीसंबंधी आजारांची अशीच काही लक्षणं तुम्हाला सांगणार आहोत. जर तुमची किडनी योग्य पद्धतीनं काम करत नसेल तर पाणी प्यायल्यानंतर काही लक्षणं दिसतात. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये.

१) किडनीमध्ये वेदना

जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाही, तेव्हा फिल्टर प्रक्रिया स्लो होते. यामुळे पाणी किडनीतून हळुवारपणे ब्लॅडरकडे म्हणजे ओटीपोटाकडे जातं. अशात जेव्हाही तुम्ही पाणी पिता तेव्हा किडनीमध्ये पाणी जास्त जमा होतं आणि यामुळे पाणी प्यायल्यानंतर किडनीमध्ये वेदना होतात.

२) मळमळ-उलटी

जेव्हाही काही किडनीसंबंधी काही समस्या होते, तेव्हा मळमळ-उलटी ही सगळ्यात सामान्य लक्षणं दिसतात. तसेच जर किडनीची समस्या जास्तच वाढली असेल तर पाणी प्यायल्यावर लगेच मळमळ आणि उलटी अशी लक्षणं दिसतात. त्यामुळे असं काही होत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा.

३) चक्कर येणं

ज्या लोकांमध्ये किडनी खूप आधीपासून खराब असेल किंवा योग्यपणे काम करत नसेल अशा लोकांना नेहमीच चक्कर येते किंवा डोकं गरगरतं. खासकरून जास्त पाणी प्यायल्यावर किडनीवर दबाव वाढतो आणि यामुळे डोकं गरगरतं. तसेच डोकं दुखतं सुद्धा.

४) लगेच लघवी लागणं

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावं लागत असेल तर हा किडनी खराब होत असल्याचा किंवा झाल्याचा संकेत असू शकतो. मात्र, हिवाळ्यात किंवा एसीमध्ये जास्त राहिल्यानं सुद्धा पाणी प्यायल्यावर लगेच लघवी लागू शकते. तरी सुद्धा एकदा किडनीची टेस्ट केलेली बरी.

५) अचानक थकवा-कमजोरी

किडनी खराब झाल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवते. मात्र, पाणी प्यायल्यानंतर लगेच अचानक कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर हा किडनी गंभीरपणे खराब झाल्याचा संकेत असू शकतो. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

18 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

18 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

18 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

20 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago