आरोग्य

पाणी प्यायल्यावर लगेच ‘ही’ लक्षणं दिसणं म्हणजे किडनी डॅमेजचे संकेत…

आजकाल भरपूर लोक किडनीसंबंधी आजारांचे शिकार होत आहेत. किडनीचा काही आजार झाला तर याची शरीरात काही लक्षणं दिसतात. पण कधी कधी काहीच लक्षणं दिसत नाहीत. अशात जेव्हा किडनीसंबंधी आजाराची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर किडनीसंबंधी आजार ओळखता येऊ शकतात. आज किडनीसंबंधी आजारांची अशीच काही लक्षणं तुम्हाला सांगणार आहोत. जर तुमची किडनी योग्य पद्धतीनं काम करत नसेल तर पाणी प्यायल्यानंतर काही लक्षणं दिसतात. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये.

१) किडनीमध्ये वेदना

जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाही, तेव्हा फिल्टर प्रक्रिया स्लो होते. यामुळे पाणी किडनीतून हळुवारपणे ब्लॅडरकडे म्हणजे ओटीपोटाकडे जातं. अशात जेव्हाही तुम्ही पाणी पिता तेव्हा किडनीमध्ये पाणी जास्त जमा होतं आणि यामुळे पाणी प्यायल्यानंतर किडनीमध्ये वेदना होतात.

२) मळमळ-उलटी

जेव्हाही काही किडनीसंबंधी काही समस्या होते, तेव्हा मळमळ-उलटी ही सगळ्यात सामान्य लक्षणं दिसतात. तसेच जर किडनीची समस्या जास्तच वाढली असेल तर पाणी प्यायल्यावर लगेच मळमळ आणि उलटी अशी लक्षणं दिसतात. त्यामुळे असं काही होत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा.

३) चक्कर येणं

ज्या लोकांमध्ये किडनी खूप आधीपासून खराब असेल किंवा योग्यपणे काम करत नसेल अशा लोकांना नेहमीच चक्कर येते किंवा डोकं गरगरतं. खासकरून जास्त पाणी प्यायल्यावर किडनीवर दबाव वाढतो आणि यामुळे डोकं गरगरतं. तसेच डोकं दुखतं सुद्धा.

४) लगेच लघवी लागणं

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावं लागत असेल तर हा किडनी खराब होत असल्याचा किंवा झाल्याचा संकेत असू शकतो. मात्र, हिवाळ्यात किंवा एसीमध्ये जास्त राहिल्यानं सुद्धा पाणी प्यायल्यावर लगेच लघवी लागू शकते. तरी सुद्धा एकदा किडनीची टेस्ट केलेली बरी.

५) अचानक थकवा-कमजोरी

किडनी खराब झाल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवते. मात्र, पाणी प्यायल्यानंतर लगेच अचानक कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर हा किडनी गंभीरपणे खराब झाल्याचा संकेत असू शकतो. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

15 तास ago