आरोग्य

हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचं कारण ठरतात या गोष्टी, वेळीच खाणं करा बंद

हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात.

सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब फुटत आहेत. या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर मोठी अडचण होऊ शकते.

डोकेदुखी आणि थंडीचा संबंध

थंड वातावरण आणि कमी उन्हामुळे बॅरोमेट्रिक प्रेशर बदलतं. ज्याकारणाने ब्लड प्रेशर बदलून डोकेदुखी, मायग्रेनचं कारण बनू शकतं. त्याशिवाय थंड हवा मेंदुच्या नसा आणि रक्त वाहिन्यांना संकुचित करतात, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढते.

दिवस लहान असणं हेही कारण

हिवाळ्यात दिवस लहान असल्यानेही डोकेदुखीची समस्या होते. मोठ्या रात्री आणि दिवस लहान असल्याने आपलं झोपण्या-उठण्याचं सर्कल बदलतं. ज्यामुळे डोकेदुखी वाढते.

थंडीच्या दिवसात हीटर-ब्लोअरसारखे इनडोर हीटींग टूल्समुळे बॉडी डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. ज्यामुळे मेंदू आकुंचन पावतो आणि अमेरिकन मायग्रेन फाउंडेशननुसार ही स्थिती डोकेदुखीचं कारण बनू शकते.

हिवाळ्यात घर गरम ठेवण्यासाठी रूम हीटर्स लावल्याने आणि खिडक्या-दरवाजे बंद असल्याने व्हेंटिलेशन योग्यपणे होत नसल्याने रूममध्ये कार्बन मोनोऑक्साइड गॅस जमा होते. जो डोकेदुखीचं कारण बनतो.

सूप प्यायल्याने वाढते डोकेदुखी

थंडीच्या दिवसात स्वत:ला गरम ठेवण्यासाठी अनेकदा लोक बाजारातील सूप, नूडल्ससारखे पदार्थ खातात. ज्यात मोनोसोडियम ग्लूटामेट असतं. ज्यामुळे अनेकदा हिवाळ्यात डोकेदुखी होते. म्हणून हिवाळ्यात हे पदार्थ कमी खावेत.

कसा कराल बचाव

हिवाळ्यात जेव्हाही बाहेर जाल तेव्हा स्वत:ला गरम कपड्यांनी कव्हर करा. खासकरून डोकं.

भरपूर पाणी प्यावे.

व्हिटॅमिन डी असलेली फळं भरपूर खावीत.

पुरेशी झोप आणि हेल्दी डाएटवर फोकस करा.

नियमितपणे एक्सरसाइज करा.

जास्त कॅफीन जसे की, कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

7 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

13 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

13 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

13 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

14 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago