CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
हिवाळ्यात अनेकांना खोकल्याची समस्या होत असते. वातावरण बदलामुळे ही समस्या अधिक जास्त जाणवते. वातावरण बदलाचा सगळ्यात जास्त प्रभाव इम्यून सिस्टीमवर पडतो. अशात लोकांना सर्दी, खोकला, घशात खवखव, फ्लूसारखी लक्षणं दिसू लागतात. सगळ्यात जास्त त्रास खोकल्यामुळे होतो.
खोकला ही तशी सामान्य समस्या आहे. पण त्यामुळे दिवसभरातील कामे रखडतात. खासकरून अस्थमा किंवा श्वासासंबंधी पीडित रूग्णांना खोकल्याने जास्त त्रास होतो. जर कोरडा खोकला असेल तर अजूनच समस्या होते.
खोकल्याचा बेस्ट उपाय मध
खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी मधाचा वापर करू शकता. ते म्हणाले की, अनेकजण आरोग्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी मधाचा वापर करण्यासाठी सांगतात. मधात अनेक अॅंटी-बायोटिक तत्व असतात जे खोकला दूर करण्यास मदत करतात.
खोकला कसा दूर करतं मध
मधात अॅंटी-माइक्रोबियल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. हेच कारण आहे की, मधामुळे खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा सुरक्षित आणि प्रभावी ठरतं.
खोकल्याचं सिरप बनवण्याचं साहित्य
1/2 चमचा लिंबूची साल
1/2 आल्याची मूळं
1 एक पाणी
1/2 कप लिंबाचा रस
असं बनवा खोकल्याचं औषध
एका भांड्यात लिंबाची साल, आल्याचे तुकडे आणि एक कप पाणी टाकून 5 मिनिटे गरम होऊ द्या.
गरम झाल्यावर ते एका कपमध्ये भरा आणि पॅनमध्ये एक कप मध टाका.
मध हलक्या आसेवर गरम करा आणि त्यात लिंबू व आल्याचं मिश्रण टाकून थोडं घट्ट सिरप बनवा.
हे मिश्रण एका भांड्यात स्टोर करा आणि गरज लागेल तेव्हा सेवन करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…