आरोग्य

दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर तुकडा चघळा शुगरही राहील नियंत्रणात

सध्याच्या काळात बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ‘डायबिटीस’ नियंत्रणात ठेवणे अनेकांना खूपच अवघड वाटते. रक्तातील वाढलेली साखर केवळ शरीराला थकवा देत नाही, तर ती इतर अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील छोट्या-छोट्या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. खरंतर, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात वापरली जाणारी दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘इन्सुलिन’ सारखेच काम करते. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी, घरगुती आणि नैसर्गिक उपायांमध्ये ‘दालचिनी’ वरदानच ठरते. आयुर्वेदात दालचिनीला औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जाते, कारण ती इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते आणि ग्लुकोज पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.

योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दालचिनीचा समावेश केल्यास डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासोबतच हृदय आरोग्य, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्तीही सुधारू शकते. केवळ पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दालचिनी अत्यंत गुणकारी मानली जाते. मसाल्याच्या डब्यातील दालचिनी फक्त पदार्थांचा स्वादच वाढवत नाही, तर ती डायबिटीसच्या रुग्णांसाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यासाठी दालचिनी फायदेशीर घरगुती उपाय ठरू शकतो. दालचिनी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती ते पाहूयात. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी कशी फायदेशीर याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी कशी फायदेशीर… 

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, दालचिनी हा केवळ जेवणाची चव वाढवणारा मसाला नसून त्यात अनेक महत्वाचे औषधी गुणधर्म असतात. हे शरीराला इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत करते. दररोज दालचिनीचा एक छोटा तुकडा आपल्या आहारात समाविष्ट केला, तर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मोठी मदत मिळते. दालचिनी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी (Insulin Sensitivity) सुधारते, ज्यामुळे शरीरातील पेशी ग्लुकोजचा योग्य वापर करू शकतात. यामुळे ‘फास्टिंग ब्लड शुगर’ कमी होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यास मदत करतात. दालचिनी केवळ ब्लड शुगरच नियंत्रित करत नाही, तर संपूर्ण ‘मेटाबॉलिक सिस्टम’ सुधारण्यास मदत करते.

मसाल्याच्या डब्यांतील ‘या’ पानांचा प्या मॅजिकल चहा! वजन होईल झरझर कमी, दिसाल स्लिम ट्रिम… 

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा वापर कसा करावा? 

१) दिवसभरात अर्धा टीस्पून दालचिनी पावडरचा वापर पुरेसा आहे.

२) सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचा चहा घेऊ शकता.

३) जेवणानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा चघळा. यामुळे पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

४) दालचिनी पावडर सॅलॅड किंवा फळांवर वरून भुरभुरवून खाऊ शकता.

५) दालचिनीचा काढा करून पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

28 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

32 मिनिटे ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

37 मिनिटे ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

41 मिनिटे ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

12 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

12 तास ago