रोज रात्री चांगली झोप घेणं आपल्या तब्येतीसाठी खूप महत्वाची असते. पण जर रोज झोप येत नसेल तर हे आजारपणाचं एक लक्षण आहे. यामुळे शरीर दिवसभर थकलेलं, सुस्त वाटतं आणि माणूस लवकर वृद्ध होऊ लागतो. झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोजचं बिघडलेलं रूटीन. बदलत्या आणि बिझी लाइफस्टाईलमुळे लोकांना आपला थकवा घालवता येत नाही. दिवसभर कष्ट करूनही अस्वस्थतेमुळे गाढ झोप येत नाही आणि त्यामुळे शरीर अनेक आजारांनी वेढलं जातं. जर एखाद्याला झोप न येण्याची समस्या असेल तर शरीराच्या काही खास बिंदूंवर दाब दिल्याने गाढ झोप लागू शकते.
कोणते बिंदू दाबल्याने झोप चांगली लागते
झोप यावी यासाठी शरीराच्या काही ठराविक भागांवर दाब देण्याच्या प्रक्रियेला अॅक्युप्रेशर म्हणतात. ही एक प्राचीन चिनी उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराच्या विशिष्ट बिंदूंना दाब देऊन आराम आणि झोप मिळवता येते. खाली दिलेले ४ प्रेशर पॉइंट्स झोप आणण्यासाठी उपयोगी आहेत.
कानामागचा भाग
जर चिंता किंवा डोकेदुखीमुळे झोप लागत नसेल, तर कानाच्या मागील भागावर हलक्या हाताने १० ते २० वेळा दाब द्या. या बिंदूला ‘अनमियन’ म्हणतात. हे बिंदू झोप लवकर आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
भुवयांच्या मधला भाग
अनेकदा टेन्शन किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे झोप लागत नाही. अशा वेळी भुवयांच्या मधल्या भागावर हलका दाब द्या. हा बिंदू मानसिक शांतता वाढवतो आणि झोप लवकर आणण्यास मदत करतो.
मानेखालील भाग
मालिश करताना जेव्हा मानेवर हलके हात फिरवले जातात, तेव्हा झोप यायला लागते. कारण मानेच्या वरच्या भागात एक विशेष बिंदू असतो. अंगठ्याने हलका दाब दिल्यास लगेच आराम मिळतो आणि झोप येऊ लागते. हा बिंदू रिलॅक्सेशन पॉइंट म्हणून ओळखला जातो.
हातावरील बिंदू
हाताच्या बोटांमध्येही झोप आणणारे पॉइंट्स असतात. बोटांपासून मनगटापर्यंत हळुवार दाब द्या. यामुळे नर्व्ह सिस्टीमला आराम मिळतो आणि शरीर शांत होऊन झोप लागते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…