आरोग्य

रात्री चांगली झोप लागावी म्हणून शरीरातील ‘हे’ अवयव दाबून बघा, लगेच येईल गाढ झोप

रोज रात्री चांगली झोप घेणं आपल्या तब्येतीसाठी खूप महत्वाची असते. पण जर रोज झोप येत नसेल तर हे आजारपणाचं एक लक्षण आहे. यामुळे शरीर दिवसभर थकलेलं, सुस्त वाटतं आणि माणूस लवकर वृद्ध होऊ लागतो. झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोजचं बिघडलेलं रूटीन. बदलत्या आणि बिझी लाइफस्टाईलमुळे लोकांना आपला थकवा घालवता येत नाही. दिवसभर कष्ट करूनही अस्वस्थतेमुळे गाढ झोप येत नाही आणि त्यामुळे शरीर अनेक आजारांनी वेढलं जातं. जर एखाद्याला झोप न येण्याची समस्या असेल तर शरीराच्या काही खास बिंदूंवर दाब दिल्याने गाढ झोप लागू शकते.

कोणते बिंदू दाबल्याने झोप चांगली लागते

झोप यावी यासाठी शरीराच्या काही ठराविक भागांवर दाब देण्याच्या प्रक्रियेला अ‍ॅक्युप्रेशर म्हणतात. ही एक प्राचीन चिनी उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराच्या विशिष्ट बिंदूंना दाब देऊन आराम आणि झोप मिळवता येते. खाली दिलेले ४ प्रेशर पॉइंट्स झोप आणण्यासाठी उपयोगी आहेत.

कानामागचा भाग

जर चिंता किंवा डोकेदुखीमुळे झोप लागत नसेल, तर कानाच्या मागील भागावर हलक्या हाताने १० ते २० वेळा दाब द्या. या बिंदूला ‘अनमियन’ म्हणतात. हे बिंदू झोप लवकर आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

भुवयांच्या मधला भाग

अनेकदा टेन्शन किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे झोप लागत नाही. अशा वेळी भुवयांच्या मधल्या भागावर हलका दाब द्या. हा बिंदू मानसिक शांतता वाढवतो आणि झोप लवकर आणण्यास मदत करतो.

मानेखालील भाग

मालिश करताना जेव्हा मानेवर हलके हात फिरवले जातात, तेव्हा झोप यायला लागते. कारण मानेच्या वरच्या भागात एक विशेष बिंदू असतो. अंगठ्याने हलका दाब दिल्यास लगेच आराम मिळतो आणि झोप येऊ लागते. हा बिंदू रिलॅक्सेशन पॉइंट म्हणून ओळखला जातो.

हातावरील बिंदू

हाताच्या बोटांमध्येही झोप आणणारे पॉइंट्स असतात. बोटांपासून मनगटापर्यंत हळुवार दाब द्या. यामुळे नर्व्ह सिस्टीमला आराम मिळतो आणि शरीर शांत होऊन झोप लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

6 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

6 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

6 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

6 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

6 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

6 तास ago