आरोग्य

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग

कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात, त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते.

युरीन इन्फेक्शनची लक्षणे

१) लघवी करताना जळजळ होणे.

२) लघवी करताना वेदना होणे.

३) वारंवार लघवी येणे.

४) लघवीचा गडद रंग असणे.

५) लघवीला अधिक दुर्गंध येणे.

६) गुप्तांगात खाज येणे.

७) ओटीपोटातून कळ येणे.

8) लघवी करताना रक्त येणे.

९) थंडी ताप येणे.

१०) थकवा, अशक्तपणा जाणवणे.

११) लघवी थांबून थांबून होणे.

१२) पाणी कमी पिणे.

१३) गरोदरपणात इन्फेक्शन होणे.

१४) अस्वच्छ राहणी.

१५) मासिक पाळीच्या काळात हे आजार जास्त पसरते.

1६) मणक्यात इजा झालेली असल्याने मूत्राशय निकामी झाल्याने.

१७) भूक न लागणे.

१८) आळसपणा जाणवणे.

19) वारंवार लघवी होण्याची भीती होणे.

20) कंबर दुखणे.

21) हे इन्फेक्शन किडनी, गर्भाशय कुठे ही असू शकते, असे घडल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.

हे लक्षात घ्या

बऱ्याच वेळा स्त्रिया लघवी थांबून ठेवतात, असे करणे धोकादायक असू शकते. याने मूत्र संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते.

नेहमी स्वछतागृहाचा वापर करावा.

पाळीत पॅड्स बदलत राहणे गरजेचे असते, त्या मुळेपण संसर्ग होते.

अंतर्वस्त्र नेहमी सूतीचे वापरावे.

कपडे जास्त घट्ट नसावे.

युरीन इन्फेक्शन झाल्यास चहा, कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे.

व्हिटॅमिन-सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल. नारंगी, मोसंबी, लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते.

पाणी जास्तीच जास्त पिण्याने या रोगाचा नायनाट होतो.

अननसाच्या रसाचे सेवन करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

4 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

4 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

4 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

4 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

4 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

6 तास ago