आरोग्य

चालणं, धावणं की सायकल चालवणं. कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट

सायकल चालवणं, धावणं किंवा पायी चालणं यापैकी कोणत्याही एक्सराईजने शरीराच्या गरजेनुसार फायदे मिळतात. हृदय चांगलं ठेवण्यासाठी, वजन कंट्रोल करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा विषय निघतो की, यापैकी कोणती एक्सरसाईज अधिक फायदेशीर तेव्हा कन्फ्यूजन होतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातील एकाची निवड करणं परिस्थिती आणि प्राथमिकतेवर अवलंबून असतं. आज आम्ही सांगणार आहोत की, चांगल्या आरोग्यासाठी सायकल चालवणं जास्त चांगलं की पायी चालणं की धावणं चांगलं.

पायी चालण: पायी चालणं हा व्यायामाचा एक नैसर्गिक आणि सोपा प्रकार आहे. ज्यामुळे गुडघ्याचं आरोग्य सुधारतं. तसेच जॉइंटमधील लवचिकपणा कायम राहण्यास मदत मिळते. गुडघ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी मजबूत होतात आणि वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते. पायी चालल्याने गुडघ्याच्या जॉइंटमध्ये चांगलं सर्कुलेशन होतं आणि लवचिकता वाढते. तसेच पायी चालल्याने हाडांचं आरोग्यही चांगलं राहतं. ब्लड सर्कुलेशन सुरळीत होत असल्यानं हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. सोबतच कॅलरी भरपूर बर्न होत असल्यानं वजन कमी करण्यासही मदत मिळते.

जॉगिंग (धावणं): जॉगिंगनं चालणं आणि धावण्यातील गॅप कमी होतो. धावणं ही एक हाय इन्टेन्सिटी एक्सरसाईज आहे. शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि भरपूर कॅलरी बर्न करण्यासाठी धावणं ही एक बेस्ट एक्सरसाईज आहे. एका रिसर्चनुसार, रोज ५ ते १० मिनिटांसाठी धावल्यानं कोणत्याही आजारांपासून होणारा मृत्यू धोका कमी केला जाऊ शकतो. तसेच हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. इतकंच नाही तर वजनही कमी होतं.

सायकल चालवण: जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुमचे पाय पॅडलच्या संपर्कात राहतात, यावेळी जी क्रिया होते तेव्हा गुडघ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, सायकल चालवल्याने तुमच्या गुडघ्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. क्लिनिकल रिहॅबिलिटेशनमध्ये प्रकाशित 2021 च्या एका रिपोर्टनुसार, सायकल चालवल्याने गुडघ्यांची जुनी ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या दूर होऊ शकते आणि गुडघ्यांचं कामही सुधारतं.

कशानं किती कॅलरी बर्न होतात

या तिन्ही एक्सरसाईज करताना किती कॅलरी बर्न होतात, हे तुमचं वजन, वेळ आणि इन्टेन्सिटीवर अवलंबून असतं.

रोज साधारण ४ ते ५ किलोमीटर धावल्यानं २०० ते २५० कॅलरी प्रति तासाने बर्न होतात.

रोज सामान्यपणे ८ ते १० किलोमीटर धावल्यानं ४०० ते ६०० कॅलरी बर्न होऊ शकतात.

१० ते २० किलोमीटर सायकलिंग केल्यावर ४०० ते ५०० कॅलरी प्रति तास इतक्या बर्न होतात. हाय इन्टेन्सिटी सायकलिंग करत असाल तर ७०० कॅलरी प्रति तास बर्न होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

54 मिनिटे ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

58 मिनिटे ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

1 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

1 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

3 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

4 तास ago