1) बायोलॉजिक कारणे…
शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते.
2) एंग्झायटीचा आजार…
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत असेल, तर ही एंग्झायटी आजाराची लक्षणे आहेत.
3) कमी झोप…
झोप नेहमी उत्तम असावी. नीट झोप झाली नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला सकाळी एंग्झायटी जाणवू शकते.
4) कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन…
कॅफिनयुक्त पेय किंवा साखरेच्या अतिसेवनामुळे एंग्झायटीचा धोका वाढतो. काही रिसर्चमधून ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन करू नये.
5) धूम्रपान किंवा मद्यपान…
अनेक रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, धूम्रपानामुळे किंवा मद्यपानामुळे एंग्झायटीचा धोका वाढू शकतो. सकाळी उठल्यानंतर यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो.
6) आजारी असाल तर…
जर तुम्ही आजारी असाल किंवा दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर अशा लोकांना एंग्झायटीची समस्या होऊ शकते.
7) दैनंदिन आयुष्यातील घडामोडी…
दैनंदिन आयुष्यातील घडामोडींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम जाणवतात. घर बदलणे, नोकरी बदलणे, कामाच्या ठिकाणी तणाव, मानसिक आणि शारीरिक अत्याचार, ब्रेकअप किंवा घटस्फोट, आर्थिक अडचणी, नातेसंबंधात तणाव इत्यादी गोष्टींमुळे एंग्झायटी जाणवू शकते.
एंग्झायटीचा सामना कसा करायचा…
कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा.
चांगला आरोग्यदायी नाश्ता करा.
आराम करा.
चांगली झोप घ्या.
लवकर झोपण्याची सवय लावा.
दररोजचे वेळापत्रक बनवा.
नियमित व्यायाम करा.
तणावाची परिस्थिती नीट हाताळा.
नकारात्मक विचार दूर ठेवा.
सकारात्मक विचार करणारांसोबत रहा.
छंद जोपासा.
(सोशल मीडियावरून साभार)
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…