आरोग्य

सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात

1) बायोलॉजिक कारणे…

शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते.

2) एंग्झायटीचा आजार…

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत असेल, तर ही एंग्झायटी आजाराची लक्षणे आहेत.

3) कमी झोप…

झोप नेहमी उत्तम असावी. नीट झोप झाली नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला सकाळी एंग्झायटी जाणवू शकते.

4) कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन…

कॅफिनयुक्त पेय किंवा साखरेच्या अतिसेवनामुळे एंग्झायटीचा धोका वाढतो. काही रिसर्चमधून ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन करू नये.

5) धूम्रपान किंवा मद्यपान…

अनेक रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, धूम्रपानामुळे किंवा मद्यपानामुळे एंग्झायटीचा धोका वाढू शकतो. सकाळी उठल्यानंतर यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो.

6) आजारी असाल तर…

जर तुम्ही आजारी असाल किंवा दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर अशा लोकांना एंग्झायटीची समस्या होऊ शकते.

7) दैनंदिन आयुष्यातील घडामोडी…

दैनंदिन आयुष्यातील घडामोडींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम जाणवतात. घर बदलणे, नोकरी बदलणे, कामाच्या ठिकाणी तणाव, मानसिक आणि शारीरिक अत्याचार, ब्रेकअप किंवा घटस्फोट, आर्थिक अडचणी, नातेसंबंधात तणाव इत्यादी गोष्टींमुळे एंग्झायटी जाणवू शकते.

एंग्झायटीचा सामना कसा करायचा…

कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा.

चांगला आरोग्यदायी नाश्ता करा.

आराम करा.

चांगली झोप घ्या.

लवकर झोपण्याची सवय लावा.

दररोजचे वेळापत्रक बनवा.

नियमित व्यायाम करा.

तणावाची परिस्थिती नीट हाताळा.

नकारात्मक विचार दूर ठेवा.

सकारात्मक विचार करणारांसोबत रहा.

छंद जोपासा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

3 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

5 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

7 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

20 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

20 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

20 तास ago