आरोग्य

सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात

1) बायोलॉजिक कारणे…

शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते.

2) एंग्झायटीचा आजार…

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत असेल, तर ही एंग्झायटी आजाराची लक्षणे आहेत.

3) कमी झोप…

झोप नेहमी उत्तम असावी. नीट झोप झाली नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला सकाळी एंग्झायटी जाणवू शकते.

4) कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन…

कॅफिनयुक्त पेय किंवा साखरेच्या अतिसेवनामुळे एंग्झायटीचा धोका वाढतो. काही रिसर्चमधून ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कॅफेन आणि साखरेचे अतिसेवन करू नये.

5) धूम्रपान किंवा मद्यपान…

अनेक रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, धूम्रपानामुळे किंवा मद्यपानामुळे एंग्झायटीचा धोका वाढू शकतो. सकाळी उठल्यानंतर यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो.

6) आजारी असाल तर…

जर तुम्ही आजारी असाल किंवा दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर अशा लोकांना एंग्झायटीची समस्या होऊ शकते.

7) दैनंदिन आयुष्यातील घडामोडी…

दैनंदिन आयुष्यातील घडामोडींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम जाणवतात. घर बदलणे, नोकरी बदलणे, कामाच्या ठिकाणी तणाव, मानसिक आणि शारीरिक अत्याचार, ब्रेकअप किंवा घटस्फोट, आर्थिक अडचणी, नातेसंबंधात तणाव इत्यादी गोष्टींमुळे एंग्झायटी जाणवू शकते.

एंग्झायटीचा सामना कसा करायचा…

कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा.

चांगला आरोग्यदायी नाश्ता करा.

आराम करा.

चांगली झोप घ्या.

लवकर झोपण्याची सवय लावा.

दररोजचे वेळापत्रक बनवा.

नियमित व्यायाम करा.

तणावाची परिस्थिती नीट हाताळा.

नकारात्मक विचार दूर ठेवा.

सकारात्मक विचार करणारांसोबत रहा.

छंद जोपासा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

8 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

8 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

8 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

8 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

8 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

8 तास ago