प्री-डायबिटीज म्हणजे काय?
प्री-डायबिटीज एक अशी स्थिती आहे ज्यात ब्लड शुगर लेव्हल सामान्यापेक्षा अधिक असते. पण इतकीही जास्त नसते की, याला टाइप 2 डायबिटीस म्हटलं जाईल. पण यामुळे डायबिटीसचा धोका नक्कीच राहतो. यात एक चांगली बाब ही आहे की, हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून प्री-डायबिटीजना ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल करता येऊ शकते.
ब्लड शुगर कमी करण्याचे उपाय
कारल्याचा ज्यूस
कारल्याचा ज्यूस डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान मानला जातो. याची टेस्ट कडवट नक्कीच आहे, पण यात चरेन्टिन आणि मोमोर्डिसिन नावाचे तत्व असतात, जे शरीरात इन्सुलिनचं काम करतात. हे तत्व तुमच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट करण्यास आणि तुमची इन्सुलिन सेन्सिटिविटी सुधारण्यास मदत करतात. न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं की, कारल्याचा ज्यूस तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी 30 दिवस प्यावा. यानं डायबिटीसमध्ये सुधारणा होईल.
स्ट्रिंग बीन्सचा चहा
स्ट्रिंग बीन्स म्हणजेच फरसबीच्या शेंगा शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. या शेंगाचा चहा खूप प्रभावी ठरतो. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि आवश्यक व्हिटामिन असतात. जे पॅंक्रियाटिक हेल्थचा सपोर्ट करतात. या चहानं ग्लूकोज स्पाइक कमी करण्यास आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. या शेंगाचा चहा तयार करण्यासाठी 5 शेंगा घ्या आणि त्यांचे तुकडे करा. या शेंगा दीड कप पाण्यात उकडा आणि एक कप शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करा. हे पाणी सकाळी उपाशीपोटी किंवा सायंकाळी 4 ते 5 वाजता पिऊ शकता.
मेथीच्या बिया
शुगर लेव्हल मॅनेज करण्यासाठी मेथीच्या बिया सुद्धा खूप फायदेशीर मानल्या जातात. मेथीच्या बियांमध्ये डायटरी फायबर असतं. या बियांमुळे तुमची भूक कंट्रोल होते, कोलेस्टेरॉल कमी होतं आणि सोबतच शुगरही कंट्रोल राहते. मेथीच्या बियांचं पाणी करण्यासाठी एक चमचा मेथीच्या बिया घ्या. या बिया एक कप पाण्यात उकडा. हे पाणी गाळून सकाळी उपाशीपोटी प्यावं.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…