आरोग्य

मजबूत हाड होण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला कोणता धोका होतो…

कॅल्शियम हे एक असं खनिज आहे, जे हाडं आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासह स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील कार्य करते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. दातही कमी वयात पडतात, किंवा दातांचा त्रास होऊ लागतो. यासह हृदयाचे आजार आणि शरीर थकल्यासारखे आणि अशक्त वाटू लागते. शरीराचे कार्य चांगले ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. परंतु काही लोकांसाठी, कॅल्शियम हानिकारक ठरू शकते. कॅल्शियमयुक्त पदार्थ नेमके कुणी खाऊ नये.

किडनी स्टोन: मेयो क्लिनिक या वेबसाईटनुसार, कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. किडनी स्टोन तयार होण्यासाठी खनिजांचा वापर होतो. सामान्य प्रकारचा किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्सलेटपासून बनलेला असतो. अशा परिस्थितीत कॅल्शियमयुक्त जास्त पदार्थ खाऊ नये.

हायपर कॅल्सेमिया: हायपर कॅल्सेमिया ही अशी स्थिती आहे जिथे रक्तामध्ये खूप जास्त कॅल्शियम असते. हायपर क्लेसीमियाच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, जास्त तहान, वारंवार लघवी होणे ही समस्या निर्माण होते. ही समस्या कायम राहिल्यास, किडनीचे विकारही वाढतात. तुम्हाला हायपर क्लेसीमिया असल्यास किंवा तो होण्याचा धोका असल्यास, कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं टाळा.

सारकोइडोसिस: सारकोइडोसिस शरीराच्या जवळजवळ कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. हा आजार विशेषतः फुफ्फुस आणि लिम्फ नोड्सवर परिणाम करतो. यामध्ये विशेषतः रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते. ज्यामुळे हायपरक्लेसीमिया होऊ शकतो. सारकोइडोसिस असलेल्या लोकांनी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं टाळावे.

हृदयरोग आणि एथेरोस्क्लेरोसिसग्रस्त रुग्ण: जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतल्याने एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढू शकतो. ही अशी स्थिती आहे जिथे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होते, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडचण येते. शिवाय नसा कडक होण्याचा धोका वाढतो, अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDAचा हातोडा; 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी…

20 मिनिटे ago

स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…

24 मिनिटे ago

भीमा नदीत वाहून गेलेल्या साहेबराव मुळीक यांचा तीन दिवसांनी मृतदेह सापडला

शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…

29 मिनिटे ago

सोलापूर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार…

33 मिनिटे ago

संजय राऊत अन् नरेश म्हस्के आमनेसामने; ‘अरे ये ना… यावंच लागणार आहे ना!’ म्हणत राऊतांचा टोला

धनुष्यबाणाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात खडाजंगी; नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : शिवसेना पक्ष…

1 तास ago

पुणे मार्केट यार्डात डाळिंबाची विक्रमी आवक; १०० टन माल दाखल

पुणे : डाळिंबाचा हंगाम सुरू होताच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची विक्रमी…

1 तास ago