आरोग्य

तोंडातील फोड आणि हिरड्यांची समस्या तुरटीचा उपयोग केल्याने होतील दूर

तोंडाला येणारे फोड ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या सामान्य असली तरी या समस्येचा त्रास खूप जास्त होतो. तोंडात फोड आले तर काही खाणं-पिणं अवघड होऊन बसतं. अशात वेगवेगळी औषधं घेतली जातात. पण औषधांऐवजी ही समस्या एका नॅचरल उपायाने दूर करता येते. तो उपाय म्हणजे तुरटी.

तोंडातील फोड: तोंडाला आलेले फोड अनेक दिवस त्रास देतात. जोपर्यंत हे फोड असतात तोपर्यंत तुम्ही योग्यपणे खाऊही शकत नाही आणि काही पिऊही शकत नाही. जर तोंडात फोड झाले असतील तर तुरटीच्या पाण्याने दोन ते तीन वेळ गुरळा करा. दोन दिवसात आराम मिळेल.

हिरड्यांची समस्या: अनेकदा लोकांमध्ये हिरड्यांची कमजोरी, हिरड्यांमधून पस येणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या बघायला मिळतात. या समस्या तुम्ही केवळ 2 रूपयांच्या तुरटीने दूर करू शकता. यासाठी तुरटीचं पावडर तव्यावर टाकून जाळा. या पावडरने बोटांच्या मदतीने हिरड्यांवर घासा. दोन दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

त्वचेची समस्या: खाज, फोड, पुरळ अशा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. तुरटी आंघोळ करताना शरीरावर घासू शकता. याने तुमच्या त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतील. सोबतच घामाची दुर्गंधी येणंही बंद होईल. तसेच सुरकुत्याही दूर होतील.

तळपायांवर डाग: तळपायांवर मृत पेशी, डाग असतील तर तेही तुरटीच्या पाण्याने दूर करण्यास मदत मिळते. तुरटीच्या पाण्याचं मिश्रण तयार करा आणि पायांवर लावा. याने पायांवरील मृत पेशी, जखमा बऱ्या होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

41 मिनिटे ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

45 मिनिटे ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

56 मिनिटे ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

9 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

10 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

10 तास ago