आरोग्य

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची असते. यापेक्षा कमी झोप घेतल्याने आरोग्य बिघडू शकतं. पण बरेच लोक यापेक्षा जास्त वेळ झोपतात. पण असं करणं त्यांच्यासाठी खूप जास्त घातक ठरू शकतं. जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून अनेक गंभीर समस्यांपासून तुमचा बचाव होईल.

१) सतत डोकेदुखी

आपल्या शरीरात तयार होणारे सेरोटोनिन हार्मोन्स आपल्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या पॅटर्नला कंट्रोल करतात. जर तुम्ही खूप जास्त झोपत असाल तर, सेरोटोनिनवर याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतो. याने न्यूरोट्रान्समीटर बाधित होतात. ज्यामुळे डोके दुखीची समस्या होऊ शकते. तेच तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला अचानक जास्त भूक आणि तहान लागू शकते. याने डोकेदुखी होऊ लागते.

२) नियमितपणे पाठदुखी

जर तुम्हाला उशीरापर्यंत झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला नेहमीच पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. मॅट्रेसची खराब क्वालिटीही याचं कारण असू शकते. अशात तर तुम्ही मॅट्रेसवर जास्त उशीरापर्यंत झोपत असाल तर याने मांसपेशींवर दबाव पडतो आणि अशाप्रकारे जास्त काळासाठी पाठदुखीचा त्रास होत राहतो.

३) डिप्रेशन-तणाव

उशीरापर्यंत झोपणं डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं. जर तुम्ही उशीरापर्यंत झोपत असाल तर याने तुमचं डिप्रेशन आणखी वाढत जाणार. स्लीपिंग सायकल बिघडत असल्याने तुम्हाला सतत तणाव आणि मानसिक दबाव जाणवतो. याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो.

४) सतत थकवा

उशीरापर्यंत झोप घेत असल्याने फ्रेश वाटण्याऐवजी थकवा जास्त जाणवतो आणि जास्त वेळ झोपेतूनही तुम्हाला दिवसभर झोप येत राहते. हा जास्त झोपण्याचा एक साइड इफेक्ट आहे. बॉडी क्लॉक बिघडल्याने असं होत असतं. जास्त आरामामुळे मांसपेशी आकुंचन पावतात. याने थकवा जाणवतो.

५) डायबिटीस

जास्त वेळ झोपल्याने हार्मोन्सचं संतुलन शरीरात बिघडतं. इन्सुलिनला कंट्रोल करणारे हार्मोन्स याने जास्त प्रभावित होतात. थकवा जाणवत असल्याने शरीरात एनर्जीची कमतरता जाणवते आणि मग तुम्ही जंक फूड किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ लागता. याने ब्लड शुगर लेव्हलही वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

1 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

1 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

1 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

2 तास ago

महाराष्ट्रात प्रथमच PLFS आणि ASUSE सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक…

2 तास ago

एकल मातांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात नवा मार्ग; प्रवेश अर्जात स्वतंत्र ‘एकल पाल्य’ रकाना

मुंबई: राज्यातील एकल मातांच्या पाल्यांना उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध सवलती, प्राधान्य व शैक्षणिक सुविधा…

2 तास ago