आरोग्य

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची असते. यापेक्षा कमी झोप घेतल्याने आरोग्य बिघडू शकतं. पण बरेच लोक यापेक्षा जास्त वेळ झोपतात. पण असं करणं त्यांच्यासाठी खूप जास्त घातक ठरू शकतं. जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून अनेक गंभीर समस्यांपासून तुमचा बचाव होईल.

१) सतत डोकेदुखी

आपल्या शरीरात तयार होणारे सेरोटोनिन हार्मोन्स आपल्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या पॅटर्नला कंट्रोल करतात. जर तुम्ही खूप जास्त झोपत असाल तर, सेरोटोनिनवर याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतो. याने न्यूरोट्रान्समीटर बाधित होतात. ज्यामुळे डोके दुखीची समस्या होऊ शकते. तेच तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला अचानक जास्त भूक आणि तहान लागू शकते. याने डोकेदुखी होऊ लागते.

२) नियमितपणे पाठदुखी

जर तुम्हाला उशीरापर्यंत झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला नेहमीच पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. मॅट्रेसची खराब क्वालिटीही याचं कारण असू शकते. अशात तर तुम्ही मॅट्रेसवर जास्त उशीरापर्यंत झोपत असाल तर याने मांसपेशींवर दबाव पडतो आणि अशाप्रकारे जास्त काळासाठी पाठदुखीचा त्रास होत राहतो.

३) डिप्रेशन-तणाव

उशीरापर्यंत झोपणं डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं. जर तुम्ही उशीरापर्यंत झोपत असाल तर याने तुमचं डिप्रेशन आणखी वाढत जाणार. स्लीपिंग सायकल बिघडत असल्याने तुम्हाला सतत तणाव आणि मानसिक दबाव जाणवतो. याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो.

४) सतत थकवा

उशीरापर्यंत झोप घेत असल्याने फ्रेश वाटण्याऐवजी थकवा जास्त जाणवतो आणि जास्त वेळ झोपेतूनही तुम्हाला दिवसभर झोप येत राहते. हा जास्त झोपण्याचा एक साइड इफेक्ट आहे. बॉडी क्लॉक बिघडल्याने असं होत असतं. जास्त आरामामुळे मांसपेशी आकुंचन पावतात. याने थकवा जाणवतो.

५) डायबिटीस

जास्त वेळ झोपल्याने हार्मोन्सचं संतुलन शरीरात बिघडतं. इन्सुलिनला कंट्रोल करणारे हार्मोन्स याने जास्त प्रभावित होतात. थकवा जाणवत असल्याने शरीरात एनर्जीची कमतरता जाणवते आणि मग तुम्ही जंक फूड किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ लागता. याने ब्लड शुगर लेव्हलही वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

7 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

7 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

7 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

7 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

12 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

12 तास ago