आरोग्य

रोजच्या आहारात सलग दोन आठवडे हळद वापरल्यास शरीरावर काय परिणाम होईल

हळद हा भारतीय घरात वापरला जाणाऱ्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे. हळदीचा वापर फक्त स्वयंपाक घरात अन्न तयार करताना केला जातो; पण त्याचबरोबर औषधी गुणधर्मांमुळे पारंपरिक विवाह समारंभात आणि सौंदर्य उपचारांसाठीही हळदीचा वापर केला जातो.

जर तुम्हाला संधिवात, टेंडोनिटिस व बर्सायटिस यांसारखे ऑटोइम्युन रोग असतील, तर हळदीचे दाहकविरोधी गुणधर्म त्यावर जादूसारखे काम करतात. मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि पायांची सूज कमी होते. त्याचे परिणाम अनुभवण्यासाठी त्यांनी हा मसाला १४ दिवस खाण्याची शिफारस केली आहे.

हळदीच्या सेवनाचे फायद

हळद ट्रायग्लिसराईडची पातळी व एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यात दाहकविरोधी, अँटी ऑक्सिडंट्स व अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात; जे जखमेच्या उपचार आणि संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे गुणधर्म संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठीही फायदेशीर आहेत.

तुम्ही हळदीचे वारंवार सेवन केल्यास आरोग्याला काही धोका संभवतो का

हळदीचे जास्त सेवन केल्याने अ‍ॅलर्जीची प्रतिक्रिया आणि अतिसार यांसारख्या पाचक समस्या होऊ शकतात. हळदीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेट देखील लक्षणीय प्रमाणात असते; ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मूतखडा (किडनी स्टोन) तयार होऊ शकतो.

कसा केला जातो हळदीचा आहारात वापर

हळद संपूर्ण स्वरूपात वापरली जाऊ शकते किंवा स्वयंपाकात सुलभतेसाठी बारीक पावडर बनवता येते. भारतीय स्वयंपाकात हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बहुतेक पाककृतींमध्ये चिमूटभर मसाल्याचा रंग आणि आरोग्यासाठी फायद्यांचा वापर केला जातो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवसेनेचा आत्मा मराठमोळ्या, रांगड्या आणि सेवाभावी शिवसैनिकातच!

मुंबई: शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या त्याग, निष्ठा आणि जनसेवेच्या…

2 मिनिटे ago

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक…

3 तास ago

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

17 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

17 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

20 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

20 तास ago