आरोग्य

१ ग्लास कोमट पाण्यात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं

तूप हा पदार्थ फक्त चवीसाठी खाल्ला जाणारा नाही तर तब्येतीसाठी अमृतासमान आहे. अनेक वर्षांपासून भारतात तुपाचा समावेश आहारात केला जात आहे. चपाती, भाकरी किंवा वरण भातावर तूप घातल्याशिवाय अनेकांना जेवणच जात नाही. तुपाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात अनेक आजारांपासून बचावसुद्धा होतो.

तुपाचे नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत राहता, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि हेल्थ एक्सपर्ट बिजय जे आनंद यांनी तूपाचा उपयोग शरीरात कोणत्या पद्धतीनं काम करतो ते सांगितले आहे. गरम पाण्यासोबत तूप मिसळून प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात.

पचनक्रिया चांगली राहते

सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यासोबत तुपाचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. तूप एक नैसर्गिक पाचक घटक आहे. ज्यामुळे पचन अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. गरम पाणी पचन तंत्रातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि टॉक्सिन्सशी लढण्यासही मदत होते

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

तूप नैसर्गिक स्वरूपात आतड्यांना पोषण देते. ज्यामुळे मल त्याग करण्याची प्रक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे पचन अग्नी संतुलित राहतो. गरम पाणी पचन तंत्रातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते.

त्वचा चमकदार दिसते

तुपातील हेल्दी फॅट्स आणि व्हिटामीन्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. तुप त्वचेच्या पेशींना आतून पोषण देते ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहरा कोरडा होणं, डाग येणं अशा समस्या उद्भवत नाहीत. चेहरा मऊ, मुलायम दिसतो.

वजन नियंत्रणात राहतं

बऱ्याच लोकांना असं वाटतं की तूप खाल्ल्यानं वजन वाढू शकतं. पण हा चुकीचा समज आहे. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यानं शरीराचं मेटाबॉलिझ्म चांगलं राहतं. अन्न पचण्याची आणि कॅलरीज जळण्याची क्षमता सुधारते. तुपातील ओमेगा ३ आणि ओमेगा ९ दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे सतत भूक लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटींग टाळता. जर तुम्हाला गरम पाण्यातून तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही वरण, भाजी किंवा पोळीत तूप घालून तुपाचा आहारात समावेश करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

33 सेकंद ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

7 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

9 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

2 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

2 तास ago