महाराष्ट्र

मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८९ तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण ७१ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. इतर व अपक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले आहेत.

या निकालामुळे मुंबई महापालिकेत महायुतीचा हिंदू मराठी महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र या युतीचा अपेक्षित प्रभाव मतदारांवर पडलेला दिसून आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ६५ जागा मिळाल्या असून तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबईची सत्ता निसटली आहे.

“भाजप शिवसेना संपवू शकत नाही”; उद्धव ठाकरे

निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

“भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत, हे या निकालांनी स्पष्ट केले आहे. भाजप जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणांचा गैरवापर करावा लागला नसता,” असा आरोप त्यांनी केला.

“मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा होती”

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,“आजही निवडून आलेले शिवसैनिक साधेच आहेत. प्रचंड पैशांच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी लढू शकते आणि जिंकू शकते, हे या शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. मी सर्व मुंबईकरांचे मनापासून आभार मानतो. मात्र मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती.”

ते पुढे म्हणाले की, “२५ वर्षे आम्ही मुंबईसाठी सेवा केली, सुधारणा केल्या. कोविड काळात राबवलेल्या मुंबई मॉडेलची जगभरात प्रशंसा झाली. हे सगळं पाहता मुंबईकर अधिक आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा होती. मोठ्या प्रमाणावर नसले तरी जे आशीर्वाद मिळाले आहेत, तेही महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…

2 तास ago

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

19 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

23 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

23 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

23 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

23 तास ago