आरोग्य

अपचन म्हणजे काय व त्याची लक्षणे कोणती

अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात.

अन्नाच्या पचनाला तोंडापासून सुरुवात होते. अन्न चावून खाल्ले की लाळेतील विकरांची प्रक्रिया होणे सोपे होते. हे अन्न अन्ननलिकेद्वारा जठरात, नंतर लहान आतड्यात व तेथून मोठ्या आतड्यात जाते. निरनिराळ्या भागांत निरनिराळे विकर अन्नावर प्रक्रिया करतात व अन्नातील निरनिराळ्या घटकांचे पचन व शोषण होते. या सामान्यपणे चालणार्‍या प्रक्रियेत व्यत्यय आला तर अपचन होते.

अपचनामुळे पोटात दुखते अथवा कळ येते. वायूमुळे आतडी फुगल्यावर वायू पुढे ढकलण्यासाठी आतड्यातील गोलाकार स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे पोट दुखते. अशा वेळी ढेकर आल्यास जठरातील आम्ल अन्ननलिकेत येते. त्यामुळे छातीत जळजळते. अन्ननलिकेच्या व जठराच्या दाहामुळे पोट दुखते.

यकृताच्या विकारात, पित्ताशयाच्या दाहात व पित्ताश्मरीत पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूस दुखते. विशेषतः स्निग्ध पदार्थ खाल्ल्यावर हे दुखणे वाढते. डाव्या बाजूस दुखले तर स्वादुपिंडाचा दाह असू शकतो. जेवल्यावर दुखणे कमी झाले तर जठराचा दाह किंवा व्रण किंवा आद्यांत्राचा व्रण दाहास कारणीभूत असू शकतो.

काही जणांना वावडे पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊ शकते. उदा., वांगी, अळू, काही मासे हे पदार्थ खाल्ल्यावर पोट दुखू लागते. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच एखाद्या विकराची न्यूनता असते. लॅक्टेज या विकराच्या न्यूनतेमुळे काही व्यक्तींना दूध पचत नाही.

गियार्डियासिस या रोगात गियार्डिया लॅम्बलिया या आदिजीवामुळे पोटात खूप वायू धरतो. विशेषत: कर्बोदके व गोड पदार्थ खाल्ल्यावर त्यांचे किणवन किण्वन होतें. पोट फुगते,गुरगुरते,शौचास पातळ होते,अपान वायू सरकतो पण त्यास दुर्गंधी नसते.

काही लोकांना हवा गिळण्याची सवय असते. मानसिक ताण व घाईघाईने खाणे यामुळेदेखील हवा जठरात जाते आणि ढेकर येतात.

अपचनाचे निदान करण्यासाठी विष्ठा व जठरातील आम्ल यांची तपासणी करतात. दुर्बिणीने आतील भागाची ही तपासणी (गॅस्ट्रोस्कोपी)करतात.

अन्नसेवनाची काही पथ्ये पाळल्यास अपचनाची समस्या दूर होते. शक्यतो शांतपणे व सावकाश जेवावे. अन्न नीट चावून खावे. अतितिखट व मसाल्याचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. अती खाणे वर्ज्य करावे. एका वेळी थोडे, असे बरेच वेळा खावे. जेवणानंतर पपईसारखी पाचक फळे खावीत. जेवणानंतर तासभर झोपू नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

14 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

14 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

19 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago