आरोग्य

अपचन म्हणजे काय व त्याची लक्षणे कोणती

अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात.

अन्नाच्या पचनाला तोंडापासून सुरुवात होते. अन्न चावून खाल्ले की लाळेतील विकरांची प्रक्रिया होणे सोपे होते. हे अन्न अन्ननलिकेद्वारा जठरात, नंतर लहान आतड्यात व तेथून मोठ्या आतड्यात जाते. निरनिराळ्या भागांत निरनिराळे विकर अन्नावर प्रक्रिया करतात व अन्नातील निरनिराळ्या घटकांचे पचन व शोषण होते. या सामान्यपणे चालणार्‍या प्रक्रियेत व्यत्यय आला तर अपचन होते.

अपचनामुळे पोटात दुखते अथवा कळ येते. वायूमुळे आतडी फुगल्यावर वायू पुढे ढकलण्यासाठी आतड्यातील गोलाकार स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे पोट दुखते. अशा वेळी ढेकर आल्यास जठरातील आम्ल अन्ननलिकेत येते. त्यामुळे छातीत जळजळते. अन्ननलिकेच्या व जठराच्या दाहामुळे पोट दुखते.

यकृताच्या विकारात, पित्ताशयाच्या दाहात व पित्ताश्मरीत पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूस दुखते. विशेषतः स्निग्ध पदार्थ खाल्ल्यावर हे दुखणे वाढते. डाव्या बाजूस दुखले तर स्वादुपिंडाचा दाह असू शकतो. जेवल्यावर दुखणे कमी झाले तर जठराचा दाह किंवा व्रण किंवा आद्यांत्राचा व्रण दाहास कारणीभूत असू शकतो.

काही जणांना वावडे पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊ शकते. उदा., वांगी, अळू, काही मासे हे पदार्थ खाल्ल्यावर पोट दुखू लागते. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच एखाद्या विकराची न्यूनता असते. लॅक्टेज या विकराच्या न्यूनतेमुळे काही व्यक्तींना दूध पचत नाही.

गियार्डियासिस या रोगात गियार्डिया लॅम्बलिया या आदिजीवामुळे पोटात खूप वायू धरतो. विशेषत: कर्बोदके व गोड पदार्थ खाल्ल्यावर त्यांचे किणवन किण्वन होतें. पोट फुगते,गुरगुरते,शौचास पातळ होते,अपान वायू सरकतो पण त्यास दुर्गंधी नसते.

काही लोकांना हवा गिळण्याची सवय असते. मानसिक ताण व घाईघाईने खाणे यामुळेदेखील हवा जठरात जाते आणि ढेकर येतात.

अपचनाचे निदान करण्यासाठी विष्ठा व जठरातील आम्ल यांची तपासणी करतात. दुर्बिणीने आतील भागाची ही तपासणी (गॅस्ट्रोस्कोपी)करतात.

अन्नसेवनाची काही पथ्ये पाळल्यास अपचनाची समस्या दूर होते. शक्यतो शांतपणे व सावकाश जेवावे. अन्न नीट चावून खावे. अतितिखट व मसाल्याचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. अती खाणे वर्ज्य करावे. एका वेळी थोडे, असे बरेच वेळा खावे. जेवणानंतर पपईसारखी पाचक फळे खावीत. जेवणानंतर तासभर झोपू नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

5 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

9 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

9 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

9 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

9 तास ago