आरोग्य

ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा काय होते.

शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशात किती वेळ राहणे आवश्यक आहे 

सूर्यस्नानासाठी सकाळी ८ ते ११ ही चांगली वेळ आहे. विशेषत: उत्तरेकडील भागात जिथे एखाद्या व्यक्तीला अत्यंत उष्ण आणि शुष्क तापमानाचा सामना करावा लागतो, तसेच त्वचेवर १५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे पुरेसे आहे.

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे कोणती

ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास विविध लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सतत थकवा, शरीरात वेदना, शारीरिक हालचालींशी संबंधित नसलेली सांधेदुखी आणि अधूनमधून किंवा सतत हाडांचे दुखणे या बाबींचा समावेश होतो.

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होतात

दीर्घकाळापर्यंत ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये हाडे कमकुवत होऊन, सामान्यत: आढळणारा ऑस्टिओपोरोसिसचा आजार होऊ शकतो. या स्थितीमुळे अस्थिभंगाचा म्हणजे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. ड जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी नियमितपणे ड जीवनसत्त्वयुक्त पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. गंभीर कमतरतेच्या बाबतीत, ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन आवश्यक ठरू शकते. योग्य उपचारानंतर बऱ्याच व्यक्तींच्या लक्षणांमध्ये काही आठवड्यांत झपाट्याने सुधारणा होते.

ज्या व्यक्ती मर्यादित सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, त्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. त्यामध्ये जे लोक बराच वेळ घरामध्ये घालवतात अशा लोकांचा समावेश होतो; जसे की वृद्ध किंवा दीर्घकालीन आजार असलेले लोक. त्याव्यतिरिक्त कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये वाढलेल्या मेलेनिनमुळे सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्त्व कमी तयार होते. मेलेनिन हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून कार्य करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

10 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

19 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

19 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

20 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago