आरोग्य

ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा काय होते.

शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशात किती वेळ राहणे आवश्यक आहे 

सूर्यस्नानासाठी सकाळी ८ ते ११ ही चांगली वेळ आहे. विशेषत: उत्तरेकडील भागात जिथे एखाद्या व्यक्तीला अत्यंत उष्ण आणि शुष्क तापमानाचा सामना करावा लागतो, तसेच त्वचेवर १५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे पुरेसे आहे.

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे कोणती

ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास विविध लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सतत थकवा, शरीरात वेदना, शारीरिक हालचालींशी संबंधित नसलेली सांधेदुखी आणि अधूनमधून किंवा सतत हाडांचे दुखणे या बाबींचा समावेश होतो.

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होतात

दीर्घकाळापर्यंत ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये हाडे कमकुवत होऊन, सामान्यत: आढळणारा ऑस्टिओपोरोसिसचा आजार होऊ शकतो. या स्थितीमुळे अस्थिभंगाचा म्हणजे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. ड जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी नियमितपणे ड जीवनसत्त्वयुक्त पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. गंभीर कमतरतेच्या बाबतीत, ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन आवश्यक ठरू शकते. योग्य उपचारानंतर बऱ्याच व्यक्तींच्या लक्षणांमध्ये काही आठवड्यांत झपाट्याने सुधारणा होते.

ज्या व्यक्ती मर्यादित सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, त्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. त्यामध्ये जे लोक बराच वेळ घरामध्ये घालवतात अशा लोकांचा समावेश होतो; जसे की वृद्ध किंवा दीर्घकालीन आजार असलेले लोक. त्याव्यतिरिक्त कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये वाढलेल्या मेलेनिनमुळे सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्त्व कमी तयार होते. मेलेनिन हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून कार्य करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

51 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

53 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

57 मिनिटे ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

16 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago