सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा काय होते.
शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशात किती वेळ राहणे आवश्यक आहे
सूर्यस्नानासाठी सकाळी ८ ते ११ ही चांगली वेळ आहे. विशेषत: उत्तरेकडील भागात जिथे एखाद्या व्यक्तीला अत्यंत उष्ण आणि शुष्क तापमानाचा सामना करावा लागतो, तसेच त्वचेवर १५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे पुरेसे आहे.
ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे कोणती
ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास विविध लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सतत थकवा, शरीरात वेदना, शारीरिक हालचालींशी संबंधित नसलेली सांधेदुखी आणि अधूनमधून किंवा सतत हाडांचे दुखणे या बाबींचा समावेश होतो.
ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होतात
दीर्घकाळापर्यंत ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये हाडे कमकुवत होऊन, सामान्यत: आढळणारा ऑस्टिओपोरोसिसचा आजार होऊ शकतो. या स्थितीमुळे अस्थिभंगाचा म्हणजे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. ड जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी नियमितपणे ड जीवनसत्त्वयुक्त पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. गंभीर कमतरतेच्या बाबतीत, ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन आवश्यक ठरू शकते. योग्य उपचारानंतर बऱ्याच व्यक्तींच्या लक्षणांमध्ये काही आठवड्यांत झपाट्याने सुधारणा होते.
ज्या व्यक्ती मर्यादित सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, त्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. त्यामध्ये जे लोक बराच वेळ घरामध्ये घालवतात अशा लोकांचा समावेश होतो; जसे की वृद्ध किंवा दीर्घकालीन आजार असलेले लोक. त्याव्यतिरिक्त कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये वाढलेल्या मेलेनिनमुळे सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्त्व कमी तयार होते. मेलेनिन हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून कार्य करते.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…