आरोग्य

ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहण्याची योग्य वेळ कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का शरीरासाठी ड जीवनसत्त्व किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा काय होते.

शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशात किती वेळ राहणे आवश्यक आहे 

सूर्यस्नानासाठी सकाळी ८ ते ११ ही चांगली वेळ आहे. विशेषत: उत्तरेकडील भागात जिथे एखाद्या व्यक्तीला अत्यंत उष्ण आणि शुष्क तापमानाचा सामना करावा लागतो, तसेच त्वचेवर १५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे पुरेसे आहे.

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे कोणती

ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास विविध लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सतत थकवा, शरीरात वेदना, शारीरिक हालचालींशी संबंधित नसलेली सांधेदुखी आणि अधूनमधून किंवा सतत हाडांचे दुखणे या बाबींचा समावेश होतो.

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होतात

दीर्घकाळापर्यंत ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये हाडे कमकुवत होऊन, सामान्यत: आढळणारा ऑस्टिओपोरोसिसचा आजार होऊ शकतो. या स्थितीमुळे अस्थिभंगाचा म्हणजे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. ड जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी नियमितपणे ड जीवनसत्त्वयुक्त पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. गंभीर कमतरतेच्या बाबतीत, ड जीवनसत्त्वाचे इंजेक्शन आवश्यक ठरू शकते. योग्य उपचारानंतर बऱ्याच व्यक्तींच्या लक्षणांमध्ये काही आठवड्यांत झपाट्याने सुधारणा होते.

ज्या व्यक्ती मर्यादित सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, त्यांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. त्यामध्ये जे लोक बराच वेळ घरामध्ये घालवतात अशा लोकांचा समावेश होतो; जसे की वृद्ध किंवा दीर्घकालीन आजार असलेले लोक. त्याव्यतिरिक्त कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये वाढलेल्या मेलेनिनमुळे सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्त्व कमी तयार होते. मेलेनिन हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून कार्य करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला सेनेचा ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा १५ जूनपासून

११ जिल्ह्यांतील ८३ मतदारसंघांचा संघटनात्मक आढावा मुंबई: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…

1 मिनिट ago

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द…

4 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

21 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

21 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

1 दिवस ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

1 दिवस ago