आरोग्य

वामकुक्षी म्हणजेच काय…

ज्याप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नियमित आणि पुरेशी झोप देखील उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. झोपेच्या रूपामध्ये मेंदूला मिळणाऱ्या विश्रांतीमुळे मेंदू अधिक सक्रीय होतो. त्यामुळे मेंदूची कार्यशक्ती सुधारून स्मरणशक्ती अधिक तल्लख होण्यास मदत होते. पुरेश्या विश्रांतीने शरीराचा थकवा आणि मनावरील तणाव कमी होण्यास मदत होत असून, शरीरामध्ये उत्साह संचारतो, बुद्धी सचेत रहाते, शरीराचे तापमान आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. या दृष्टीने दुपारची वामकुक्षी अतिशय महत्वाची असल्याचे आता वैज्ञानिक संशोधनाच्या द्वारे सिद्ध झाले आहे.

नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अध्ययनाच्या अनुसार वामकुक्षी तीन प्रकारांमध्ये विभागली जाऊ शकते. यामध्ये ‘प्रेपरेटरी नॅप्स’, ‘इमर्जन्सी नॅप्स’ आणि ‘हॅबिचुअल नॅप्स’ हे तीन प्रकार समाविष्ट आहेत. अतिशय झोप येण्यापूर्वी थोड्या वेळासाठी घेतलेली वामकुक्षी ‘प्रेपरेटरी नॅप’ म्हणून ओळखली जाते, तर कधी काम करीत असताना अतिशय थकल्यामुळे, काम करत राहणे अशक्य होऊन बसते. अश्यावेळी आधीपासून न ठरविता घेतलेली वामकुक्षी ‘इमर्जन्सी’ या प्रकारात मोडते. दिवसभराच्या कामामधून काही वेळ बाजूला ठेवत दररोज नियमित घेतली जाणारी वामकुक्षी ‘हॅबिचुअल’ म्हटली जाते. अश्या प्रकारची वामकुक्षीची सवय लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्येही, विशेषतः वयस्क मंडळींमध्ये सामान्यपणे पाहिली जाते.

ज्याप्रमाणे वामकुक्षीची सवय भारतामध्ये सामान्य आहे, त्याचप्रमाणे जगामध्ये अनेक देशांमध्येदेखील वामकुक्षीचा प्रघात सर्वमान्य आहे. स्पेनमध्ये ही वामकुक्षी ‘सियेस्ता’ या नावाने ओळखली जाते, तर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मात्र वामकुक्षीची पद्धत नाही. वैज्ञानिकांच्या अनुसार म्हणूनच या देशांमध्ये मानसिक नैराश्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे प्रमाण अधिक असून, या देशांमध्ये उच्चरक्तदाब, हृदयरोगासारख्या विकारांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वामकुक्षी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले जाते. वामकुक्षी घेणे महत्वाचे आहेच, पण ही वामकुक्षी किती वेळासाठी घेतली जाते यावरही त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे अवलंबून असतात.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार दररोज वीस मिनिटे घेतलेली वामकुक्षी मेंदू सक्रीय ठेवण्यासाठी, आणि स्मरणशक्ती तल्लख करण्याच्या कामी उपयुक्त आहे. वीस ते तीस मिनिटे घेतलेली वामकुक्षी क्रियाशीलता वाढविण्यासाठी सहायक असते. तीस मिनिटे ते एक तास घेतलेली वामकुक्षी उत्तम निर्णयक्षमता प्रदान करणारी असते, तर एक ते दीड तासांसाठी घेतलेली वामकुक्षी संपूर्णपणे शरीराचा थकवा घालविणारी आणि मेंदू पूर्णपणे ‘रीचार्ज’ करणारी असते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

12 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

12 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

12 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

21 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

21 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

21 तास ago