भारतात तेलाचा वापर रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तेलाशिवाय अनेक पदार्थांचा किंवा भाज्यांचा विचारही केला जाऊ शकत नाही. तेल शरीरासाठी आवश्यकही असतं, पण याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरात चरबी वाढून लठ्ठपणा वाढतो आणि सोबतच हृदयरोगांचा धोकाही वाढतो. यामुळे डॉक्टर नेहमीच तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला देत असतात. अशात कोणतं तेल आरोग्याचं नुकसान करणार नाही किंवा कोणतं तेल घातक असत, असा प्रश्न मनात येणं सहाजिक आहे.
कोणतं तेल फायदेशीर
खाण्यासाठी मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल सगळ्यात बेस्ट तेल आहेत. या तेलांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतं. जे हृदयासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. हृदयासंबंधी अनेक समस्या कमी करण्यास मोहरीच्या तेलानं मदत मिळते.
मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो म्हणजे हे तेल जेव्हा जास्त गरम होतं तेव्हाच याची संरचना खराब होते. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं, जे मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतं. या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. मोहरीचं तेल त्वचा आणि केसांसाठी फार चांगलं असतं. या तेलानं शरीरातील वेदना दूर होते. मोहरीच्या तेलानं पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.
ऑलिव्ह ऑइलचे फायदे
ऑलिव्ह ऑइलमध्येही अनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे हृदयासाठी फायदेशीर असतं. यानं रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका कमी होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा असतं. जे शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये मदत करतं.
इतर फायदेशीर तेल
मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल खाण्यासाठी सगळ्यात चांगले असले तरी, त्यासोबतच तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
कोणत्याही प्रकारच्या व्हेजिटेबल तेलाला कधीही जास्त गरम करू नये. जर तेल जास्त गरम केलं तर त्याचं शॉर्ट चेन फॅटी अॅसिड तुटेल आणि ते ऑक्सीडाइन होऊ लागले. ज्यामुळे इन्फ्लामेशन वाढेल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…