आरोग्य

कोणतं तेल खाल्ल्यानं वजन वाढतं आणि कोणत्या तेलानं कमी होत

भारतात तेलाचा वापर रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तेलाशिवाय अनेक पदार्थांचा किंवा भाज्यांचा विचारही केला जाऊ शकत नाही. तेल शरीरासाठी आवश्यकही असतं, पण याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरात चरबी वाढून लठ्ठपणा वाढतो आणि सोबतच हृदयरोगांचा धोकाही वाढतो. यामुळे डॉक्टर नेहमीच तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला देत असतात. अशात कोणतं तेल आरोग्याचं नुकसान करणार नाही किंवा कोणतं तेल घातक असत, असा प्रश्न मनात येणं सहाजिक आहे.

कोणतं तेल फायदेशीर

खाण्यासाठी मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल सगळ्यात बेस्ट तेल आहेत. या तेलांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतं. जे हृदयासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. हृदयासंबंधी अनेक समस्या कमी करण्यास मोहरीच्या तेलानं मदत मिळते.

मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो म्हणजे हे तेल जेव्हा जास्त गरम होतं तेव्हाच याची संरचना खराब होते. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं, जे मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतं. या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. मोहरीचं तेल त्वचा आणि केसांसाठी फार चांगलं असतं. या तेलानं शरीरातील वेदना दूर होते.  मोहरीच्या तेलानं पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

ऑलिव्ह ऑइलचे फायदे

ऑलिव्ह ऑइलमध्येही अनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे हृदयासाठी फायदेशीर असतं. यानं रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका कमी होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा असतं. जे शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये मदत करतं.

इतर फायदेशीर तेल

मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल खाण्यासाठी सगळ्यात चांगले असले तरी, त्यासोबतच तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

कोणत्याही प्रकारच्या व्हेजिटेबल तेलाला कधीही जास्त गरम करू नये. जर तेल जास्त गरम केलं तर त्याचं शॉर्ट चेन फॅटी अॅसिड तुटेल आणि ते ऑक्सीडाइन होऊ लागले. ज्यामुळे इन्फ्लामेशन वाढेल.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

2 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

2 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

2 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

2 तास ago