आरोग्य

जखम झाल्यावर धनुर्वात प्रतिबंधक लस का देतात

जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये, यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात. टिटॅनस टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची, घरातील, शेतातील माती वा इतर घाण जाऊ शकते. धनुर्वाताच्या जिवाणूच्या बीजावस्था (स्पोर) असतात. हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता, कोरडेपणा यांना सहजगत्या तोंड देऊ शकतात.

सुयोग्य वातावरण मिळाल्यास या बीजावस्थाचे रूपांतर धनुर्वाताच्या जंतूमध्ये होते. हे जंतू मग एक भयंकर विष निर्माण करतात. या विषाचा परिणाम मेंदूवर व स्नायूवर होतो. यामुळे धनुर्वात या रोगात स्नायू कडक होणे, शरीराची कमान होणे, दातखीळ बसणे, झटके येणे अशा गोष्टी पाहावयास मिळतात. या आजारात मृत्यूचे प्रमाण जरी आता खूप कमी झाले असले तरी, नवजात बालकांमध्ये मात्र मृत्यूचे प्रमाण ८० टक्के इतके आहे.

धनुर्वात होऊ नये, यावर एकमेव खात्रीलायक इलाज म्हणजे धनुर्वाताची लक्षणे ज्या विषामुळे दिसतात त्या विषाचा बीमोड करण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे..ही लस घेतल्यानंतर सुमारे २१-३० दिवसांत आपल्या रक्तात धनुर्वाताच्या जंतूच्या विषाविरुद्ध कार्य करणारे प्रतिद्रव्य तयार होते. त्यामुळे धनुर्वात होणे टाळता येते. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे: ती म्हणजे, आज घेतलेल्या लसीचा उपयोग महिन्या भरानंतर होतो. धनुर्वाताचा अधिशयन काल काही दिवसांचाही असू शकतो. साहजिकच जखम झाल्यावर घेतलेल्या टीटीच्या लसीमुळे, त्या जखमेमुळे धनुर्वात होणार असेल तर फारसा उपयोग होत नाही. यासाठी काय करावे?

लहान मुलांना दीड महिन्यापासून त्रिगुणीच्या लसी द्याव्या. एखाद्याने कोणतीच लस घेतली नसेल, तर महिन्याच्या अंतराने टीटीची दोन इंजेक्शने द्यावी. त्यामुळे त्याला धनुर्वातापासून ५ वर्षे संरक्षण मिळेल. नंतर दर ५ ते १० वर्षांनी एक इंजेक्शन घ्यावे. अशा प्रकारे आपण केव्हाही होणाऱ्या जखमांपासून उद्भवू शकणाऱ्या धनुर्वाताचा प्रतिबंध करू शकतो. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी (शक्य असेल तेव्हा) बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेच्या आधी सुमारे महिनाभर यासाठीच टीटीचे इंजेक्शन घेणे गरजेचे असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

17 मिनिटे ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

1 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

2 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

2 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

3 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

7 तास ago