आरोग्य

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात, जाणून घ्या कारण…

भरपूर लोक जेवण बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात. असं मानलं जातं की, मोहरीचं तेल एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. इतकंच नाही तर या तेलामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असतं.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण भरपूर लोक तळपायांवर मोहरीचं तेल लावतात. याने काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. या तेलाने त्वचा नॅचरल पद्धतीने मॉइश्चराईज होते. तळपायांना हे तेल लावून मालिश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचे फायदे

मोहरीच्या तेलाला आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. याच्या सेवनासोबतच याने मालिश केल्याने मसल्सना आराम मिळतो. या तेलाने मालिश केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं. रात्री तेलाने तळपायांनी मालिश केल्याने पायांना आराम मिळतो आणि मेंदुही रिलॅक्स होतो. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोपही येते.

झोप चांगली लागते:- ज्या लोकांना झोप न येण्याची म्हणजे इन्सोम्नियाची समस्या असते, त्यांच्यासाठी हे तेल खूप फायदेशीर ठरतं. या लोकांनी रात्री झोपण्याआधी कोमट तेलाने तळपायांची मालिश करावी. यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. जे लोक तणाव किंवा चिंतेचे शिकार आहेत त्यांनी रोज या तेलाने तळपायांची मालिश करावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

2 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

3 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

16 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

16 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

16 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

16 तास ago