मुख्य बातम्या

Video: सदाभाऊ खोत शिरुरमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू अन्…

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्रातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगाबाबत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी टिका केली होती. त्यामुळे खोत यांच्यावर सगळ्या बाजुने टिकेची झोड उठली आहे. शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या या वक्त्याव्याचा निषेध करत जर खोत शिरुर मध्ये प्रचारासाठी आले. तर त्यांच्या तोंडाला काळं फासत त्यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे.

‘शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना माझ्या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखाववल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीला खोत यांनी जोरदार लक्ष्य केले होते. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, असे जाहीर सभांमधून सांगतोय. तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी अभद्र टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशी तंबीही अजित पवार यांनी महायुतीतील नेत्यांना दिली आहे

शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.

दिलगिरी…
माझी गावगाड्याची भाषा आहे. काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. गावगाड्याची भाषा असते. एखादा आभाळाकडं बघत असला तर आम्ही म्हणतो आरशात जाऊन बघ. गावगाड्याची भाषा समजायला मातीत रुजावं लागतं. मातीत राबावं लागतं आणि मातीतच मरावं लागतं. तेव्हाच गावाकडेची आणि मातीची भाषा समजते अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करताना दिली.

लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

12 मिनिटे ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

37 मिनिटे ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

1 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

1 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

5 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

5 तास ago