साखरेचा वापर वाढल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, आपल्या आहारातून साखर काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गूळ. आवड म्हणून साखर खाणे ठीक आहे, पण गरज म्हणून गुळाचा वापर वाढला तर जीवन आरोग्यदायी राहण्यास मदत होते. पण दुर्दैवाने गुळाचं मोठे उत्पादन होत असताना देखील आपल्या चहातून गूळ गायब झाला आहे.
साखर ही शरीराला हानिकारकच आहे, अनेक आजारांच मुळ हे साखरेतच दडले आहे. तरीही आपण साखर खाणे सोडत नाही. विशेष म्हणजे ‘कोल्हापुरी गुळा’ने जगाला भुरळ घातली आहे. पण येथील नागरिक त्याचा वापर फार कमी प्रमाणात करतात. साखरेच्या चहा ऐवजी गुळाचा चहा रोज घेतला तर तो आरोग्याच्यादृष्टीने अधिक फायदेशीर ठरतो. अलीकडे आहारातील गुळाचा वापर खूप कमी झाला आहे. ग्रामीण भागही त्याला अपवाद राहिलेला नाही. वर्षातून सणाला केल्या जाणाऱ्या पुरणपोळीमध्ये एवढाच काय तो गुळाचा वापर राहिला आहे. शहरात काही ठिकाणी तर पुरणपोळीत गुळाऐवजी साखरेचाच वापर केला जातो. पूर्वी पाहुणा घरी आला की चहा, सरबत ऐवजी गूळ शेंगा दिल्या जायच्या. आरोग्य सुदृढ ठेवायचे झाल्यास आपल्या रोजच्या जीवनात साखरेचे प्रमाण कमी करून गुळाचा सहभाग वाढविण्याची गरज आहे.
गूळ हृदयरोगासाठी एकदम उपयुक्त
हृदयाच्या आरोग्यासाठी गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे तसेच अँटिऑक्सिडंट्सच्या चांगुलपणाने भरलेले हे नैसर्गिक स्वीटनर आहे.
गुळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
गुळ दाहक-विरोधीदेखील आहे आणि रक्ताभिसरण वाढविण्यात मदत करतो.
सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी ६ आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच, यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
विशेषतः शेतात काम करणाऱ्या महिलांनी रक्त वृद्धीसाठी गुळ खाणे फायदेशीर आहे.
गुळाच्या चहाचे स्टॉल
मोठ्या शहरात आता गुळाच्या चहाचे स्टॉल सुरु झाले आहेत. मात्र, अद्यापही लोकांमध्ये गुळाबाबत फारशी जागृती दिसत नाही. गूळ पिकविणारा शेतकरीही याबाबत सजग नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…