आरोग्य

गुळ का खाल्ला पाहिजे काय आहेत गुळाचे फायदे

साखरेचा वापर वाढल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, आपल्या आहारातून साखर काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गूळ. आवड म्हणून साखर खाणे ठीक आहे, पण गरज म्हणून गुळाचा वापर वाढला तर जीवन आरोग्यदायी राहण्यास मदत होते. पण दुर्दैवाने गुळाचं मोठे उत्पादन होत असताना देखील आपल्या चहातून गूळ गायब झाला आहे.

साखर ही शरीराला हानिकारकच आहे, अनेक आजारांच मुळ हे साखरेतच दडले आहे. तरीही आपण साखर खाणे सोडत नाही. विशेष म्हणजे ‘कोल्हापुरी गुळा’ने जगाला भुरळ घातली आहे. पण येथील नागरिक त्याचा वापर फार कमी प्रमाणात करतात. साखरेच्या चहा ऐवजी गुळाचा चहा रोज घेतला तर तो आरोग्याच्यादृष्टीने अधिक फायदेशीर ठरतो. अलीकडे आहारातील गुळाचा वापर खूप कमी झाला आहे. ग्रामीण भागही त्याला अपवाद राहिलेला नाही. वर्षातून सणाला केल्या जाणाऱ्या पुरणपोळीमध्ये एवढाच काय तो गुळाचा वापर राहिला आहे. शहरात काही ठिकाणी तर पुरणपोळीत गुळाऐवजी साखरेचाच वापर केला जातो. पूर्वी पाहुणा घरी आला की चहा, सरबत ऐवजी गूळ शेंगा दिल्या जायच्या. आरोग्य सुदृढ ठेवायचे झाल्यास आपल्या रोजच्या जीवनात साखरेचे प्रमाण कमी करून गुळाचा सहभाग वाढविण्याची गरज आहे.

गूळ हृदयरोगासाठी एकदम उपयुक्त

हृदयाच्या आरोग्यासाठी गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे तसेच अँटिऑक्सिडंट्सच्या चांगुलपणाने भरलेले हे नैसर्गिक स्वीटनर आहे.

गुळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

गुळ दाहक-विरोधीदेखील आहे आणि रक्ताभिसरण वाढविण्यात मदत करतो.

सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.

गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी ६ आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच, यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.

विशेषतः शेतात काम करणाऱ्या महिलांनी रक्त वृद्धीसाठी गुळ खाणे फायदेशीर आहे.

गुळाच्या चहाचे स्टॉल

मोठ्या शहरात आता गुळाच्या चहाचे स्टॉल सुरु झाले आहेत. मात्र, अद्यापही लोकांमध्ये गुळाबाबत फारशी जागृती दिसत नाही. गूळ पिकविणारा शेतकरीही याबाबत सजग नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

2 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

6 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

6 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

6 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

6 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

6 तास ago