आपल्या शरीरात किडनी हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शरीरात असलेल्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकण्यास किडनी मदत करते. किडनी निरोगी असल्यास अनेक आजारांवर मात करता येऊ शकते. किडनीचे आजारही अनेकदा जीवघेणे ठरु शकतात. मुतखड्याचा त्रास आजकाल अनेकांना छळतो. अगदी तरुण वयातही मूतखड्यानं असह्य वेदना सहन करणारे आहेतच. किडनीचे आजार टाळायचे तर काही गोष्टी नियमित करायला हव्या.
काय नियमित करायला हव
भरपूर पाणी प्या: किडनीचे आरोग्य राखण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी विषारी पदार्थ फिल्टर करते आणि शरीर हायड्रेट ठेवते. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
धुम्रपान टाळा: धुम्रपान केल्यानं किडनीचं आरोग्य बिघडते. शिवाय किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. यासह हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही वाईट परिणाम होतात. कालांतराने किडनी खराब होऊ शकते.
वजन ठेवा आटोक्यात: वजन आटोक्यात ठेवणं आवश्यक. यामुळे किडनीसह हृदय निरोगी राहण्यासही मदत होते. वाढलेलं वजन अनेक समस्यांचं कारण ठरतं.
व्यायाम आवश्यक: धावणे, पोहणे, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, योगा, पायलेट्स आणि स्ट्रेचिंग रोज करणं एकूण शरीरासह किडनीचंही आरोग्य ठणठणीत ठेवतं.
(सोशल मीडियावरून साभार)
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…