रोज २ ते ३ वेळ जेवण करणं ही आपल्या शरीराची गरज असते. कारण आहाराशिवाय आरोग्य चांगलं राहू शकत नाही. जेवणाचे काही नियम असतात. पण सगळेच लोक ते फॉलो करतात असं नाही. जास्तीत जास्त लोक जेवणाआधी आणि नंतर काहीना काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.
जेवणानंतर आंघोळ करू नये
जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.
जेवणानंतर किती वेळाने करावी आंघोळ
जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.
जेवणानंतर लगेच झोपू नये
जेवण केल्यावर लगेच झोपणंही आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही. असं केलं तर शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि लठ्ठपणाचा धोका अधिक वाढतो. अन्न चांगलं पचन व्हावं यासाठी गरजेचं आहे की, जेवण केल्यावर काही वेळ पायी चालावं.
जास्त पाणी पिऊ नये
जेवणानंतर पाणी पिणं फार गरजेचं असतं. कारण याने अन्न पचन होण्यास मदत मिळते. पण जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय चुकीची आहे. जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्याल तर अन्न पचन होत नाही. अशात पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…