मुख्य बातम्या

शिरुरच्या पुर्व भागातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात पिंपळसुटी येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन रक्षा अजय निकम (वय ४ वर्षे, रा. पिंपळसुटी, ता. शिरुर, जि. पुणे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. (दि २४) रोजी सायंकाळी ७ ते ७:३० दरम्यान हि दुर्दैवी घटना घडली असुन चिमुकलीला तिच्या आई समोरच बिबटयाने या चिमुरडीला फरफटत नेले आणि दोन तासानंतर या चिमुरडीचा लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे.

 

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात आत्तापर्यंत तिसऱ्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. मुलीचा मृतदेह पाहतात मुलीचे आई-वडील व नातेवाईकांनी टाहो फोडल्याने परिसरातील महिला नागरिक गहिवरले होते. या बिबट्याच्या हल्ल्यात चिमूरडीचे धड व डोके वेगळे झाले असल्याने पुन्हा एकदा मांडवगण फराटा येथे १५ नोव्हेंबर रोजीचा शिवतेज टेंभेकर या पाच वर्षे मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या घटनेची आठवण झाली आहे.

आई समोरच चिमुकलीला बिबटयाने उचलले…

पिंपळसुटी येथे नदीच्या कडेला दशक्रिया घाटाजवळ राहणाऱ्या निकम यांची चार वर्षाची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळेस लाईट गेल्याने तिची आई दुसऱ्या मुलाला जेऊ घालत असताना अचानक आई समोरच बिबट्याने हल्ला करत चिमुरडीला शेतामध्ये फरफटत नेले. आईने त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या तिला ओढत लांब घेऊन गेला. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्याने आसपासचे नागरिक जमा झाले. त्यानंतर मुलीचा शोध घेत असताना वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन येऊन मुलीचा शोध सुरु केला. जवळपास दोन ते अडीच तासाने चिमुरडीचा मृतदेह आढळला आहे. वन खात्याच्या वतीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

 

शिरुरच्या पुर्व भागातील तिसरी दुर्दैवी घटना…

शिरुर तालुक्यातील पूर्व भागात या अगोदर मांडवगण फराटा येथे दोन लहान मुलांना नातेवाईकांसमोर बिबट्याने हल्ला करून ठार मारले आहे. त्यानंतर पुर्व भागातील हि तिसरी दुर्दैवी घटना आहे. त्यात या चार वर्षीय लहान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अगोदर मांडवगण-वडगाव रासाई परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वीस पिंजरे लावले होते. त्यात मांडवगण फराटा-वडगाव रासाई परिसरात दोन तर रांजणगाव सांडस परिसरात दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.

 

भय इथले संपत नाही…

मांडवगण फराटा परिसरात रोज बिबट्याचा वावर असुन गेल्या आठ दिवसापुर्वी एका व्यक्तीच्या पाठीमागे बिबट्या लागला होता. तर दोन पशुधनाचा बळीही त्याने घेतला होता. तसेच मांडवगण फराटा येथे दोन मुलांचा जीव घेणाऱ्या नरभक्ष बिबट्यानेच तर हा हल्ला केला तर नाही ना अशी शंका वन विभागाला आहे. तसेच आसपासचे नागरीकही या घटनेमुळे भयभीत झालेले आहेत.

 

वनविभागाने पिंजरे लावण्याची मागणी… 

शिरुर तालुक्यातील पुर्व भागात बिबट्यांची संख्या मोठी असुन, मांडवगण फराटा नंतर पिंपळसुटी या गावात नरभक्षक बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात रक्षा निकम या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिक व शाळकरी मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ वनविभागाने पिंजरे लावावे अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक शशिकांत वेताळ यांनी केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

5 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

6 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

6 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

6 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

6 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

6 तास ago