आरोग्य

थंडी म्हणजे सांधेदुखी आलीच हे ५ नियम लक्षात ठेवा, शरीर अजिबात आखडणार नाही

थंडीची चाहूल लागली की अनेकांना गुडघे, खांदे, पाठीचे किंवा मनगटाचे दुखणे वाढल्याचे जाणवते. विशेषतः ज्यांना संधिवात, जुनी इजा किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक ठरतो. या दिवसांत शरीर आखडल्यासारखं वाटतं, हालचाल करणे कठीण होते आणि थोडं चाललं तरी वेदना वाढतात. पण नेमकं असं का होतं आणि यावर काय करायला हवं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण मंदावतो. यामुळे सांध्यांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही, त्यामुळे स्नायू, लिगामेंट्स आणि जोडणारे ऊतक घट्ट आणि ताठर होतात. याच अवस्थेला ‘सांधे आखडणे’ असं म्हणतात. थंड हवेत शरीरातील नैसर्गिक स्नेहन द्रव म्हणजेच joint fluid घट्ट होतो, त्यामुळे सांध्यांची हालचाल सुरळीत होत नाही आणि दुखणे जाणवते. परिणामी, चालताना किंवा उठबस करताना वेदना होतात. थंड वातावरणामुळे लोक कमी हालचाल करतात, व्यायाम टाळतात, ज्यामुळे स्नायू अधिक कमकुवत होतात आणि दुखण्याची तीव्रता वाढते.

थंडीमध्ये सांधेदुखी वाढण्यामागे अनेक कारणं असतात. रक्ताभिसरण कमी होणं, स्नायू ताठ होणं, पाण्याचं प्रमाण घटणं आणि शरीरात उष्णता टिकवण्याच्या प्रयत्नात ऊर्जा खर्च होणं ही प्रमुख कारणं आहेत. काही वेळा जुन्या इजा, संधिवात, किंवा हाडांतील झीज यामुळेही हिवाळ्यात वेदना वाढतात. शरीराच्या स्नायूंना आणि हाडांना पुरेसा उबदारपणा मिळाला नाही, तर हालचाल करताना प्रत्येक सांधा जणू जड वाटू लागतो. यावर उपाय म्हणून सर्वात पहिले शरीर उबदार ठेवणं आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत गरम कपडे वापरा, विशेषतः गुडघे आणि हात झाकून ठेवा. रात्री झोपताना अंगावर चादर घ्या, पाय झाकलेले ठेवावा. सकाळी उठल्यावर हलका व्यायाम करा. चालणे, योगासनं, स्ट्रेचिंग यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू सैल होतात.

गरम पाण्याने अंघोळ करणे हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. गरम पाण्यामुळे स्नायू शिथिल होतात आणि वेदना कमी होते. काहींना गरम पाण्याची पिशवी ठेवण्यानेही आराम मिळतो. मात्र सांध्यांमध्ये सूज असेल तर थंड पट्टी उपयोगी ठरते. आहारात कॅल्शियम, जीवनसत्त्व डी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड यांचा समावेश असणारे पदार्थ घ्या. दूध, दही, तीळ, बदाम हे पदार्थ सांध्यांना बळकटी देतात. थंडीत तहान कमी लागते, पण पाणी पुरेसं पिणं विसरू नका. शरीरातील द्रव कमी झाल्यास सांध्यांतील स्नेहन द्रव घट्ट होतो आणि वेदना वाढतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

15 तास ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago