आरोग्य

२ ग्लास पाणी पिऊन कमी करू शकता वजन, कसे ते जाणून घ्या….

एकदा वाढलेलं वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान असतं. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. अनेकदा तर लोक चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय असतात आणि त्यातील एक उपाय म्हणजे जेवण करण्याआधी पाणी पिणे. फेमस न्यूट्रिशनिस्ट एलन एरागॉन यांच्यानुसार, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी दोन ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत कशी मिळते.

पाणी पिऊन वजन कसं कमी होत 

जेवणाआधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. एलन एरागॉननुसार, जेवण करण्याआधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि कॅलरीचं प्रमाण कमी होतं.

कधी मिळतो जास्त फायदा

तुम्ही प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास साधं पाणी पिऊ शकता. याने तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तुम्ही जास्त खात नाहीत. खासकरून रात्रीच्या जेवणाआधी हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो’.

जेवणासोबत पाणी प्यावे का

जेवणासोबत थोडं पाणी प्यावे. जर तुम्ही जेवणाआधी पाणी प्यायले तर जेवण करताना तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे लोकांनी जेवण करताना पाणी प्यायल्याने पचन योग्यपणे होणार नाही याची काळजी करू नये.

जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पाण्यात कॅलरी कमी असतात, याने पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही कमी खाता. जे लोक जेवणाआधी जवळपास ५०० मिली पाणी पित होते, त्यांचं वजन १२ आठवड्यांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत जास्त कमी झालं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

16 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

16 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

20 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago