आरोग्य

२ ग्लास पाणी पिऊन कमी करू शकता वजन, कसे ते जाणून घ्या….

एकदा वाढलेलं वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान असतं. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. अनेकदा तर लोक चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय असतात आणि त्यातील एक उपाय म्हणजे जेवण करण्याआधी पाणी पिणे. फेमस न्यूट्रिशनिस्ट एलन एरागॉन यांच्यानुसार, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी दोन ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत कशी मिळते.

पाणी पिऊन वजन कसं कमी होत 

जेवणाआधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. एलन एरागॉननुसार, जेवण करण्याआधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि कॅलरीचं प्रमाण कमी होतं.

कधी मिळतो जास्त फायदा

तुम्ही प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास साधं पाणी पिऊ शकता. याने तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तुम्ही जास्त खात नाहीत. खासकरून रात्रीच्या जेवणाआधी हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो’.

जेवणासोबत पाणी प्यावे का

जेवणासोबत थोडं पाणी प्यावे. जर तुम्ही जेवणाआधी पाणी प्यायले तर जेवण करताना तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे लोकांनी जेवण करताना पाणी प्यायल्याने पचन योग्यपणे होणार नाही याची काळजी करू नये.

जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पाण्यात कॅलरी कमी असतात, याने पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही कमी खाता. जे लोक जेवणाआधी जवळपास ५०० मिली पाणी पित होते, त्यांचं वजन १२ आठवड्यांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत जास्त कमी झालं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

43 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

51 मिनिटे ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

53 मिनिटे ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

4 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

4 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

4 तास ago