महाराष्ट्र

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी; पत्रकार संघाची मागणी

मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना खासदार पाटील यांनी “माझे काय करायचे ते करा, समोर पोलीस आहेत, कमिशनरकडे तक्रार करा” अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप संघाने केला आहे. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची दमदाटीची भाषा शोभणारी नसून पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा हा अपमान असल्याचे संघाने म्हटले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांशी अशा पद्धतीने वागणे म्हणजे केवळ पत्रकारांचाच नव्हे तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचाही अवमान आहे. लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नांना संयमाने आणि जबाबदारीने उत्तरे देणे अपेक्षित असते. पत्रकारांना धमकावण्याचा किंवा त्यांची अवहेलना करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत समाजात चुकीचा संदेश जात असल्याची चिंता व्यक्त करत मुंबई मराठी पत्रकार संघाने खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

10 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

10 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

10 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

11 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

11 तास ago