महाराष्ट्र

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, मॅनहोल सुरक्षा आणि पूरनियंत्रणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात पाहणी करणारे अधिकारीच उघड्या मॅनहोलमध्ये पडत असतील, तर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमतातून जनतेच्या पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवूनही सखल भागांमध्ये दरवर्षी पाणी तुंबत असल्याने कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.

“वर्षानुवर्षे सामान्य मुंबईकर मॅनहोल, खड्डे आणि पाण्यात पडत होते, तेव्हा प्रशासनाला जाग आली नाही. मात्र अधिकारी मॅनहोलमध्ये पडताच संपूर्ण व्यवस्था हादरली. सामान्य नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या जीवाची किंमत वेगवेगळी आहे का?” असा उपरोधिक सवालही ॲड. मातेले यांनी केला.

मुंबईकरांच्या कररूपी पैशांचा नेमका वापर कुठे झाला, याचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे. तसेच नालेसफाईच्या कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

2 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

2 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

2 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

2 तास ago

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दुचाकीचोर; चार चोरीच्या मोटारसायकली जप्त

शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शिक्रापूर पोलिसांना…

2 तास ago