महाराष्ट्र

मालवणी शौचालय सेप्टीक टँक दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना ₹ ९० लाखांची मदत

मुंबई: मागील वर्षी मालवणी, अंबोजवाडी येथील मनपा शौचालयाच्या सेप्टीक टँक मध्ये पडून खाजगी कामगार असलेल्या रामलगन केवट व त्यांचे दोन मुलगे विकास केवट, सुरज केवट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार अस्लम शेख यांनी राज्यसरकार व महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून आधी ₹ ३० लाख व शुक्रवारी ₹ ६० लाख असे एकूण ९० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.

गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेत रामलगन केवट यांच्या पत्नी इंद्रावती केवट यांनी आपले पती व दोन मुलगे गमावले. कुटुंबाचा आधारच गेल्याने लहान मुलाचा, मुलीच्या भवितव्याचे काय हा प्रश्न इंद्रावती यांच्या समोर उभा राहिला होता. इंद्रावती यांचे सासरे देखील वयोवृद्ध व आजारपणाने बेजार झालेले असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील उभा राहिला.

स्थानिक आमदार या नात्याने आमदार अस्लम शेख यांनी केवट कुटुंबीयांना काही मदत मिळावी यासाठी राज्यसरकार व पालिकेशी सातत्यपुर्ण पाठपुरावा चालू केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि मृत रामलगन केवट यांच्या पत्नी इंद्रावती यांना ₹ ३० लाखांचे सहाय्य करण्यात आले. मात्र ही मदत पुरेशी नव्हती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्या नंतर पालिकेकडून आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते आज ₹ ६० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना शेख म्हणाले, केवट कुटुंबीयांनी जे गमावल त्याची भरपाई होऊ शकत नाही. मात्र ह्या रकमेमुळे केवट यांच्या पत्नी इंद्रावती व त्यांचा मुलगा व मुलगी यांचे भविष्य सुरक्षित होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदोडी येथे माती टाकण्याच्या वादातुन बाहेरचे गुंड आणुन दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

3 मिनिटे ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

6 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

6 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

6 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

6 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago