संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पालकांसमोर एक मोठे आव्हान बनत चालले आहे.
नेमक प्रकरण काय
मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. हा मुलगा शिक्षणासोबत पोलीस भरतीची देखील तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आईनेने मोबाईल घेण्यास स्पष्ट नकार दिला.
आईच्या नकाराने तो नाराज झाला होता. या नकाराने तो थेट खवडया डोंगरकडे गेला आणि उंचावरून उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलीस या घटनेचा पुढील तपस करत आहेत. मात्र, या घटनेने आता सर्व पालकांसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…