महाराष्ट्र

३० आमदारांची सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमण्याची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. पक्षातील तब्बल ३० आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी विनंती करणारे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे.

अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर शरदचंद्र पवार गटाकडून विलीनीकरणाचे मौखिक पुरावे सादर केले जात असताना, ही घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठी दुसरा मोठा राजकीय हादरा मानली जात आहे.

विशेष म्हणजे, शनिवारी विधान भवनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड प्रक्रिया सुरू असतानाच, त्याच दिवशी काही आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या विनंतीपत्रावर सह्या गोळा करण्यास सुरुवात केली होती. हे पत्र सोमवारी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर करण्यात आले आहे.

या पत्रावर केवळ आमदारच नव्हे, तर पक्षाच्या युवक, विद्यार्थी, सांस्कृतिक तसेच विविध सेलच्या अध्यक्षांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आमदारांच्या पत्रातील ठळक मुद्दे

पत्रात नमूद करण्यात आले आहे की,“अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पक्षावर मोठा आघात झाला आहे. अशा कठीण काळात पक्षाला संघटित ठेवण्यासाठी शांत, सक्षम आणि विश्वासार्ह नेतृत्वाची नितांत गरज आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून पक्ष व महाराष्ट्राप्रती आपली निष्ठा सिद्ध केली आहे. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पूर्णपणे योग्य आहेत.”या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील नेतृत्वाची दिशा आणि संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

2 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

2 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

13 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago