क्राईम

मोठी कारवाई! वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी निलंबित

नवी मुंबई: नवी मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. फसवणुकीच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी न करता तो परस्पर दप्तरी दाखल करून संबंधित आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत केल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. युनूस कासम सोत आणि उमेश मनहरलाल उधानी यांच्यात भूखंड तडजोड कराराच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.

४ सप्टेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर तत्काळ गुन्हा दाखल न करता, तब्बल महिन्याभरानंतर ११ ऑक्टोबर २०२५ रोजी तो अर्ज परस्पर दप्तरी दाखल करण्यात आला. या गंभीर त्रुटीचा फायदा घेत संबंधित आरोपींनी बेलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवला.

याशिवाय, अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडी स्वतः न्यायालयात हजर न राहता दुय्यम अधिकाऱ्यास पाठवण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. हे वर्तन पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारे, बेजबाबदार आणि अनुचित ठरल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

37 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

41 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

46 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

53 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago