महाराष्ट्र

मोदींच्या कारभारामुळे देशात सत्ताबदल होणार; २०२९ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : आगामी काळात देशात सत्ताबदल होणार असून, हा बदल काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षामुळे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांतील कारभारामुळे होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२०२९ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वबदलाची तयारी सुरू झाली असून, अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे, असाही दावा चव्हाण यांनी केला.

पूर्णवेळ शिक्षणमंत्र्याची गरज

मोदी सरकारच्या उर्वरित कार्यकाळात देशाला पूर्णवेळ शिक्षणमंत्री मिळणे आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले. सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची खाती असल्याने शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्यासाठी पूर्णवेळ मंत्री असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारा, परीक्षाव्यवस्थेतील गोंधळ कमी करणारा आणि मूलभूत शिक्षणाच्या समस्या जाणणारा शिक्षणमंत्री देशाला हवा. मात्र, सध्याच्या मोदी सरकारमध्ये अशी व्यक्ती दिसत नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. लवकरच मोदी देशाला चांगला शिक्षणमंत्री देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

फडणवीसांना शिक्षणमंत्रिपद दिल्यास विरोध

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळण्याच्या चर्चांवरही चव्हाण यांनी भाष्य केले. फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रिपद दिल्यास त्याला काँग्रेसचा विरोध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी झाल्याचा आरोप करत फडणवीस शिक्षणमंत्रिपदासाठी योग्य व्यक्ती नसल्याचे चव्हाण म्हणाले.

समृद्धी महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर टीका

नाशिकमधील पायाभूत सुविधांवरही चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. समृद्धी महामार्गाने नाशिकला येताना योग्य दिशादर्शक फलक नसल्यामुळे आपला रस्ता चुकल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकसारख्या आधुनिक शहरात अशा मूलभूत सुविधांची कमतरता असणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

नाशिकमध्ये येताना रस्त्यांवरील खड्ड्यांचाही अनुभव आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. सहा कोटी लोक नाशिकमध्ये आले तर शहर हा भार पेलू शकेल का, याचा विचार झाला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या नावाखाली केवळ पैसे खाण्याचा विषय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केरळमध्ये शिवसेनेचा विस्तार; ‘८० टक्के सामाजिक सेवा, २० टक्के राजकीय काम’ मॉडेलवर भर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये संघटनात्मक विस्ताराला वेग देताना शिवसेनेने सामाजिक सेवेला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली…

50 मिनिटे ago

बीडच्या राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पॉक्सो गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीड येथील राष्ट्रीय पातळीवरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक…

1 तास ago

राष्ट्रवादीत भाजपचे स्लीपर सेल? सच्चिदानंद सिंहांच्या नोटिशीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला पक्षांतर्गत वाद आता नव्या राजकीय आरोपांमुळे…

1 तास ago

गणेशोत्सवासाठी आता स्वस्तात एसटी आरक्षित करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी…

1 तास ago

टाटा कार खरेदीचा विचार करताय? १ सप्टेंबरपासून गाड्या महागणार; २५ हजारांपर्यंत वाढ

मुंबई : टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या…

2 तास ago

रात्री लवकर जेवणाचे फायदे

मानवाच्या आहाराची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. नास्तापासून डिनरपर्यंत खाण्याचा विशिष्ट वेळ असतो. त्यावेळेच…

2 तास ago