मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदा पराभव स्वीकारावा लागला असून, मुंबईत त्यांना केवळ ६५ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दु:खद घटना घडली. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या व निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग मर्यादित होता, त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नेतृत्वाची संधी दिली होती. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणूनही प्रभावी कामगिरी बजावली होती.
निकालानंतर प्रकृती बिघडली
मुंबईतील पराभव स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटात शोकाकुल वातावरण होते. निकाल लागल्यानंतर काही वेळातच नीला देसाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे ठाकरे गटाला राजकीय पराभवासोबतच भावनिक आघाताचाही सामना करावा लागला आहे.
राजकीय वर्तुळातून शोकभावना
नीला देसाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…