महाराष्ट्र

ठाकरे गटाला दुहेरी धक्का! शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदा पराभव स्वीकारावा लागला असून, मुंबईत त्यांना केवळ ६५ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

दरम्यान, निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दु:खद घटना घडली. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या व निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग मर्यादित होता, त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नेतृत्वाची संधी दिली होती. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणूनही प्रभावी कामगिरी बजावली होती.

निकालानंतर प्रकृती बिघडली

मुंबईतील पराभव स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटात शोकाकुल वातावरण होते. निकाल लागल्यानंतर काही वेळातच नीला देसाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे ठाकरे गटाला राजकीय पराभवासोबतच भावनिक आघाताचाही सामना करावा लागला आहे.

राजकीय वर्तुळातून शोकभावना

नीला देसाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

11 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago