मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदा पराभव स्वीकारावा लागला असून, मुंबईत त्यांना केवळ ६५ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दु:खद घटना घडली. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या व निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग मर्यादित होता, त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नेतृत्वाची संधी दिली होती. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणूनही प्रभावी कामगिरी बजावली होती.
निकालानंतर प्रकृती बिघडली
मुंबईतील पराभव स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटात शोकाकुल वातावरण होते. निकाल लागल्यानंतर काही वेळातच नीला देसाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे ठाकरे गटाला राजकीय पराभवासोबतच भावनिक आघाताचाही सामना करावा लागला आहे.
राजकीय वर्तुळातून शोकभावना
नीला देसाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…