मुंबई: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आखाती देशांवरही जाणवत असून, अनेक मराठी नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे.
ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर आदी भागांतील नागरिकांनी मदतीसाठी शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे तब्बल ८४ विद्यार्थी सध्या दुबईत अडकले असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
दुबईतील बृहनमहाराष्ट्र मंडळ यांच्या सहकार्याने शिंदे यांनी डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर देत, “या कठीण प्रसंगी महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले.
याशिवाय दुबईत अडकलेल्या इतर मराठी नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “कोणतीही चिंता करू नका. जिथे आहात तिथे तुम्हाला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी समन्वय सुरू असल्याची माहिती देत शिंदे यांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले.
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…