मुंबई: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आखाती देशांवरही जाणवत असून, अनेक मराठी नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे.
ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर आदी भागांतील नागरिकांनी मदतीसाठी शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे तब्बल ८४ विद्यार्थी सध्या दुबईत अडकले असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
दुबईतील बृहनमहाराष्ट्र मंडळ यांच्या सहकार्याने शिंदे यांनी डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर देत, “या कठीण प्रसंगी महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले.
याशिवाय दुबईत अडकलेल्या इतर मराठी नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “कोणतीही चिंता करू नका. जिथे आहात तिथे तुम्हाला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी समन्वय सुरू असल्याची माहिती देत शिंदे यांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले.
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…