मुंबई: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आखाती देशांवरही जाणवत असून, अनेक मराठी नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे.
ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर आदी भागांतील नागरिकांनी मदतीसाठी शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे तब्बल ८४ विद्यार्थी सध्या दुबईत अडकले असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
दुबईतील बृहनमहाराष्ट्र मंडळ यांच्या सहकार्याने शिंदे यांनी डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर देत, “या कठीण प्रसंगी महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले.
याशिवाय दुबईत अडकलेल्या इतर मराठी नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “कोणतीही चिंता करू नका. जिथे आहात तिथे तुम्हाला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी समन्वय सुरू असल्याची माहिती देत शिंदे यांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…