मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीने काढल्याचे सांगितले जात असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांना फेटाळत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अंजली दमानिया यांच्या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, “अंजली दमानिया यांच्या आजच्या विधानांमधून समाजात किती खालच्या पातळीची विकृती असू शकते, हे स्पष्ट होते. कपोल-कल्पित गोष्टी सांगून एखाद्या व्यक्तीची आणि कुटुंबाची सतत बदनामी करणे ही त्यांची सवय झाली आहे.”
चाकणकर यांनी यापूर्वी दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा उल्लेख करत, त्यापैकी एकही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नसल्याचे सांगितले. “आज त्या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करत आहेत. संबंधित कुटुंबाने आपला घरातील व्यक्ती गमावला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त करत असताना, मुलावरच वडिलांच्या घातपाताचा आरोप करणे हे नीच पातळीचे आणि किळसवाणे आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
खारगे समितीचा अधिकृत अहवाल येण्याआधी तसेच विमान अपघाताचा तपास सुरू असताना कोणताही पुरावा न देता अशी विधाने केली जात असल्याचा आरोपही रूपाली चाकणकर यांनी केला. “सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा हा घाणेरडा प्रयत्न आहे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या आरोपांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी…
मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष…
मुंबई: महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतीच…
मुंबई: राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या…
मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज…
मुंबई: भारत महासत्ता होण्याच्या स्वप्नाचे ढोल मोठ्या आवाजात वाजत आहेत. उद्योग, गुंतवणूक, स्टार्टअप, विकास... या…