महाराष्ट्र

अंजली दमानिया यांच्याविरोधात राष्ट्रवादीची कायदेशीर कारवाई; रूपाली चाकणकर आक्रमक

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीने काढल्याचे सांगितले जात असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांना फेटाळत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अंजली दमानिया यांच्या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, “अंजली दमानिया यांच्या आजच्या विधानांमधून समाजात किती खालच्या पातळीची विकृती असू शकते, हे स्पष्ट होते. कपोल-कल्पित गोष्टी सांगून एखाद्या व्यक्तीची आणि कुटुंबाची सतत बदनामी करणे ही त्यांची सवय झाली आहे.”

चाकणकर यांनी यापूर्वी दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा उल्लेख करत, त्यापैकी एकही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नसल्याचे सांगितले. “आज त्या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करत आहेत. संबंधित कुटुंबाने आपला घरातील व्यक्ती गमावला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त करत असताना, मुलावरच वडिलांच्या घातपाताचा आरोप करणे हे नीच पातळीचे आणि किळसवाणे आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

खारगे समितीचा अधिकृत अहवाल येण्याआधी तसेच विमान अपघाताचा तपास सुरू असताना कोणताही पुरावा न देता अशी विधाने केली जात असल्याचा आरोपही रूपाली चाकणकर यांनी केला. “सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा हा घाणेरडा प्रयत्न आहे,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या आरोपांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

8 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

8 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

10 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago