महाराष्ट्र

विधानसभेत लक्षवेधीला उत्तर आणि दोन तासात शासन निर्णय; सुधीर मुनगंटीवार

मुंबई: राज्य शासनाच्या गतिमान कारभाराची चर्चा नेहमीच होते. आज त्याच गतिमान कारभाराची चुणूक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवली. विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी गडचिरोली येथील बांबू व्यवस्थापन संदर्भात समिती स्थापन घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत केवळ दोन तासातच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

वनविभाग गडचिरोली, आलापल्ली व वडसामध्ये सामूहिक वनहक्क व पेसाअंतर्गत शाश्वत बांबू व्यवस्थापनासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यासंदर्भात हा शासन आदेश आहे. या समितीत डॉ. होळी हे अध्यक्ष असतील. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, उपवनसंरक्षक हे सदस्य असतील, तर विभागीय वन अधिकारी दक्षता, गडचिरोली वनवृत्त हे सदस्य सचिव असतील.

समितीच्या माध्यमातून सामूहिक वन हक्क व पेसाअंतर्गत प्राप्त अधिकारानुसार बांबू संवर्धन करून स्थानिकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचविणे, सामूहिक वनहक्क बाहेरील वनक्षेत्रात बांबूच्या जास्त कापणीबाबत आलेल्या तक्रारींची तपासणी आणि चौकशी करणे आणि योग्य कारवाईसाठी प्रस्तावित करणे, तसेच भविष्यात अश्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी योग्य धारणांची शिफारस करणे, बांबू रोपवन कार्यक्रमात सुधारणा करणे, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन योजना तयार करणे आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक साहाय्य वनविभागामार्फत पुरविण्याबाबत शिफारशी करणे या विषयांचा अभ्यास करण्यात येईल. समितीला आपला अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होणार; सुनेत्रा पवार

मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज…

52 मिनिटे ago

महासत्तेची स्वप्ने आणि छोट्या उद्योगांचा संघर्ष! विकासाचा महामार्ग नेमका कोणासाठी

मुंबई: भारत महासत्ता होण्याच्या स्वप्नाचे ढोल मोठ्या आवाजात वाजत आहेत. उद्योग, गुंतवणूक, स्टार्टअप, विकास... या…

58 मिनिटे ago

‘मोदी मस्ट गो’! देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; यशवंत सिन्हा

मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये…

1 तास ago

जेजुरीच्या विकासासाठी श्रद्धा आणि समाजसुधारणेचा समतोल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला…

1 तास ago

शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावावर शोककळा; 11 के व्ही विद्युत तारेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या…

17 तास ago

शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी

पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…

1 दिवस ago