महाराष्ट्र

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI) परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बांद्र्यातील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे 15 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अ.भा.वि.प.च्या मते, तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर येणे ही केवळ अनियमितता नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी गंभीर बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, प्रकरण समोर येऊन अनेक दिवस उलटूनही अद्याप ठोस गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही किंवा पारदर्शक चौकशीचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. उलट, काही निवडक विद्यार्थ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदार यंत्रणेला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

अ.भा.वि.प.ने प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत:

संबंधित सर्व जबाबदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत

परीक्षा केंद्रातील प्रमुख अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे

संबंधित विषयांच्या परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा जाहीर करावी

स्वतंत्र व पारदर्शक चौकशी समिती स्थापन करावी

दरम्यान, अ.भा.वि.प. मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी सांगितले की, या प्रकरणात सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी महाविद्यालय प्रशासन व विद्यापीठ परीक्षा विभागाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. त्यांनी पुढे इशारा दिला की, संशयितांवर त्वरीत गुन्हे दाखल न झाल्यास आणि जबाबदारी निश्चित न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.तसेच, परीक्षा नियंत्रक उत्तर देण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

1 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

4 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

22 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago