महाराष्ट्र

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI) परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बांद्र्यातील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे 15 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अ.भा.वि.प.च्या मते, तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर येणे ही केवळ अनियमितता नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी गंभीर बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, प्रकरण समोर येऊन अनेक दिवस उलटूनही अद्याप ठोस गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही किंवा पारदर्शक चौकशीचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. उलट, काही निवडक विद्यार्थ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदार यंत्रणेला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

अ.भा.वि.प.ने प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत:

संबंधित सर्व जबाबदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत

परीक्षा केंद्रातील प्रमुख अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे

संबंधित विषयांच्या परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा जाहीर करावी

स्वतंत्र व पारदर्शक चौकशी समिती स्थापन करावी

दरम्यान, अ.भा.वि.प. मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी सांगितले की, या प्रकरणात सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी महाविद्यालय प्रशासन व विद्यापीठ परीक्षा विभागाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. त्यांनी पुढे इशारा दिला की, संशयितांवर त्वरीत गुन्हे दाखल न झाल्यास आणि जबाबदारी निश्चित न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.तसेच, परीक्षा नियंत्रक उत्तर देण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

7 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

7 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

7 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

18 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

18 तास ago