महाराष्ट्र

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची चिमुरडी हरवल्याची घटना घडली. गर्दीत आई-वडिलांपासून ताटातूट झाल्याने ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती. डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर थरथर—स्वतःचे नाव सांगतानाही तिचा आवाज दाटून येत होता.

सकाळच्या सुमारास पाठीवर काळी बॅग असलेली, रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत एकटी फिरताना ही मुलगी दिसली. अशा वेळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांनी तिला आधार देत शांत केले आणि प्रेमाने विचारपूस सुरू केली. मात्र, भीतीमुळे मुलीला शाळेचे नाव, पत्ता किंवा पालकांची माहिती सांगता येत नव्हती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे व मिसिंग स्टाफच्या मदतीने स्थानक परिसरात व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. रेल्वे व मेट्रो परिसरात सातत्याने उद्घोषणाही करण्यात आली.

दरम्यान, आझाद मैदान पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी मुलीच्या नातेवाईकांची माहिती पडताळून पाहिली. काही वेळातच मुलीचे वडील आणि काका तेथे पोहोचले. ओळख पटताच त्या चिमुरडीला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

हरवलेली मुलगी अनाबिया सुलतान मुस्ताक शेख (वय ८ वर्षे) आई-वडिलांच्या कुशीत परत येताच उपस्थितांचे डोळे पाणावले. काही काळासाठी भीतीदायक ठरलेला हा प्रसंग सुखरूप शेवटाकडे वळला.

मुंबई पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठेमुळे संभाव्य अनर्थ टळला. या माणुसकीच्या कार्यासाठी संबंधित पोलिस अधिकारी व पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनीही महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांचे फोनवरून अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

15 तास ago