महाराष्ट्र

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाने कारवाई केली आहे. रेश्मा पारधी असे संबंधित सेविकेचे नाव असून, त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

रेश्मा पारधी यांनी अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवत व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. शासकीय जागेचा आणि पदाचा गैरवापर करून व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मात्र, लहान मुलांच्या आरोग्याचा आणि त्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप पारधी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव यांनी सांगितले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी किंवा समस्या मांडताना शासनाने निश्चित केलेल्या नियमावली आणि आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेला सेवेतून कमी करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाले असून, त्यामुळे या प्रकरणावर अधिक भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संबंधित सेविकेला या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची संधी असल्याचेही जाधव यांनी सांगितले. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार लॅब टेस्टेड असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तसेच, रेश्मा पारधी यांनी शासकीय नियमांचा भंग केल्याबद्दल माफी मागणारा अर्ज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केल्यास सेवेतून कमी करण्याचे आदेश रद्द होऊ शकतात, अशी माहितीही जाधव यांनी दिली.

पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेविकेवरच कारवाई झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आहाराच्या दर्जाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणार का आणि सेविकेवरील कारवाईचा पुनर्विचार केला जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

59 मिनिटे ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

1 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

1 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

1 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

1 तास ago

वरळीतील नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करा; सचिन अहिर यांची पालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : वरळी परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची…

1 तास ago