महाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूचा तपास थातूरमातूर नको, अन्यथा…

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार Rohit Pawar यांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत सखोल आणि पारदर्शक चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

“चौकशी नावापुरती नको”

“अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी केवळ नावापुरती नको, तर ती सखोल आणि पारदर्शक व्हायला हवी. जर यंत्रणांनी वेळकाढूपणा केला किंवा चुकीच्या दिशेने तपास नेला, तर मराठी माणूस काय आहे हे दाखवून द्यावे लागेल,” असा इशारा रोहित पवार यांनी सरकार आणि तपास यंत्रणांना दिला.

तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

अपघातासंदर्भातील तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवताना रोहित पवार म्हणाले, “दोन रिपोर्ट आले असले तरी सर्वात महत्त्वाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. ऐनवेळी वैमानिक बदलण्याचे कारण काय? क्राईम इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट (CID) आतापर्यंत काय करत होती? तपास सेंट्रल बुरेवू ऑफ इन्वेस्टीगेशन (CBI) कडे गेला असला तरी त्यांना दोन-तीन महिने लागू शकतात. मात्र, या काळात तपासाची दिशा भरकटू नये,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांसारख्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण स्वतः या मागणीचा पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी एकसंध राहणार

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, आगामी अधिवेशनासह पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्ष आणि महाविकास आघाडी एकसंध राहील. युतीची वज्रमूठ कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवर संकेत

राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत बोलताना त्यांनी मोठे विधान केले. “खुद्द अजित पवार यांचीही इच्छा होती की शरद पवार यांनी राज्यसभेत जावे. जर शरद पवार स्वतः इच्छुक असतील, तर महाविकास आघाडीचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल,” असे ते म्हणाले. अद्याप आघाडीची अधिकृत बैठक झालेली नसली तरी इतर पक्षांची भूमिका लवकरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि तपासातील संशयास्पद मुद्द्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे तपास यंत्रणांवर आता अधिक दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

7 तास ago

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…

7 तास ago

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…

8 तास ago

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…

9 तास ago

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…

9 तास ago

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…

9 तास ago