महाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूचा तपास थातूरमातूर नको, अन्यथा…

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार Rohit Pawar यांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत सखोल आणि पारदर्शक चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

“चौकशी नावापुरती नको”

“अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी केवळ नावापुरती नको, तर ती सखोल आणि पारदर्शक व्हायला हवी. जर यंत्रणांनी वेळकाढूपणा केला किंवा चुकीच्या दिशेने तपास नेला, तर मराठी माणूस काय आहे हे दाखवून द्यावे लागेल,” असा इशारा रोहित पवार यांनी सरकार आणि तपास यंत्रणांना दिला.

तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

अपघातासंदर्भातील तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवताना रोहित पवार म्हणाले, “दोन रिपोर्ट आले असले तरी सर्वात महत्त्वाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. ऐनवेळी वैमानिक बदलण्याचे कारण काय? क्राईम इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट (CID) आतापर्यंत काय करत होती? तपास सेंट्रल बुरेवू ऑफ इन्वेस्टीगेशन (CBI) कडे गेला असला तरी त्यांना दोन-तीन महिने लागू शकतात. मात्र, या काळात तपासाची दिशा भरकटू नये,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांसारख्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण स्वतः या मागणीचा पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी एकसंध राहणार

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, आगामी अधिवेशनासह पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्ष आणि महाविकास आघाडी एकसंध राहील. युतीची वज्रमूठ कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवर संकेत

राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत बोलताना त्यांनी मोठे विधान केले. “खुद्द अजित पवार यांचीही इच्छा होती की शरद पवार यांनी राज्यसभेत जावे. जर शरद पवार स्वतः इच्छुक असतील, तर महाविकास आघाडीचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल,” असे ते म्हणाले. अद्याप आघाडीची अधिकृत बैठक झालेली नसली तरी इतर पक्षांची भूमिका लवकरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि तपासातील संशयास्पद मुद्द्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे तपास यंत्रणांवर आता अधिक दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

7 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

6 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

6 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

6 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

6 तास ago