महाराष्ट्र

अजितदादांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान; डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून शोक व्यक्त

मुंबई: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच कदम कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे.

गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या प्रशासकीय अभ्यास, ठाम निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे वलय निर्माण केले होते. त्यांचे कार्य, योगदान आणि नेतृत्व सदैव स्मरणात राहील.

भारती विद्यापीठ तसेच समस्त सांगली जिल्ह्याच्या वतीने डॉ. विश्वजीत कदम यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या निधनाने आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.ही दुःखद बातमी समजताच डॉ. विश्वजीत कदम हे बारामतीकडे रवाना झाले असून, ते पवार कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

5 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

5 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

8 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

9 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

9 तास ago