महाराष्ट्र

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: अकोला येथील अनुसूचित जामातीच्या महिलेवर अत्याचार केलेला आरोपी हा विधिमंडळाच्या परिसरात कसा फिरू शकतो? असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी सदर आरोपीला तात्काळ विधानभवनाच्या बाहेर काढून त्याला अटक करावी अशा सूचना आज विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

सन्माननीय सदस्य मा. श्री. राम शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत, अकोला येथील अनुसूचित जामातीच्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी अन्य राजकीय व्यक्तींसोबत विधानभवनाच्या परिसरात फिरताना दिसत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

याबाबतची गंभीर दखल घेत उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, सदरचे प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. ही व्यक्ती आपले काम व्हावे म्हणून दबाव आणत आहे. त्यामुळे सरकारने अकोला पोलीस अधीक्षकांसोबत तात्काळ बोलून त्या व्यक्तीला विधानभवनाच्या बाहेर काढावे आणि या महिलेला पोलीस संरक्षण देण्यात यावे.

तसेच सदर महिलेला सरकारी वकील मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने त्याबाबतही योग्य ती कार्यवाही करावी असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

यावेळी महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर प्रकरणाच्या चर्चेवेळी सभागृह संपायच्या आत निवेदन केले जाईल, असे सभागृहाला सांगितले होते. त्यानुसार सदर आरोपी विधानभवनातून पसार झाला असून त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत, असे सभागृहाला निवेदनाच्या माध्यमातून सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

2 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

9 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

9 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

9 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

9 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

10 तास ago