महाराष्ट्र

नागपूर स्फोटप्रकरणी सरकारवर हल्लाबोल; ‘हे हत्याकांडच’;  विजय वडेट्टीवार

मुंबई: नागपूर येथील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २२ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासकीय यंत्रणा आणि कंपनी मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “२२ जणांचा जीव गेला असताना आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळेल अशी कलमे का लावली? कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?” असा सवाल त्यांनी सरकारला केला. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सुरक्षा नियमांची पायमल्ली

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या गंभीर त्रुटींचा उल्लेख करताना वडेट्टीवार म्हणाले

कंपनीत फायर पंप नव्हते.

रिस्क असेसमेंट करण्यात आले नव्हते.

नियमानुसार दोन सेफ्टी ऑफिसर आवश्यक असताना फक्त एकच कार्यरत होता.

फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त डॉ. शशांक डोंगरे कधीही प्रत्यक्ष हजर नव्हते.

कंपनीत सीसीटीव्ही यंत्रणा नव्हती.

इंटरनल सेफ्टी ऑडिटची कोणतीही नोंद उपलब्ध नाही.

स्फोटक हाताळण्याचे आवश्यक प्रशिक्षण कामगारांना देण्यात आले नव्हते.

अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

पेसोचे मुख्यालय नागपुरात असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही, असा आरोप करत कामगार अधिकारी आणि निरीक्षकांनी केवळ पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळ केल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देणाऱ्या निरीक्षकाला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत, “दीड वर्षांत इतके स्फोट होऊनही सरकार नेमकी काय कारवाई करत आहे? अधिकाऱ्यांना का पाठीशी घातले जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित सुरक्षा निरीक्षक आणि पेसो अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे तसेच स्फोटकांचा साठा आणि परवानग्यांची सखोल चौकशी करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

8 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

14 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

14 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

14 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

14 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

15 तास ago