महाराष्ट्र

बाबा वेंगांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी चर्चेत; सोनं-चांदी ठरणार सुरक्षित गुंतवणूक

जगभरात संभाव्य आर्थिक संकटाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली असून यामागे प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या भाकितांचा उल्लेख होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पैशांची टंचाई निर्माण होणार असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संकटाच्या काळात सोनं, चांदी आणि तांबं या धातू सुरक्षित गुंतवणूक ठरतील, असं बाबा वेंगांनी भाकीत केलं होतं.

चर्नोबिल दुर्घटनेसारख्या अनेक घटनांची अचूक भविष्यवाणी केल्याचा दावा बाबा वेंगांबाबत केला जातो. त्यामुळे त्यांच्या 2026 मधील आर्थिक संकटाच्या भाकिताकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जात आहे. काही अफवांनुसार येत्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास भारतात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 2.11 लाख ते 2.43 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, जो आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक असेल.

सध्या एमसीएक्सवर सोनं प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.69 लाख रुपये दराने व्यवहारात आहे. 2025 पासून आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 50 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत असल्याचं चित्र आहे. भारत दरवर्षी 100 टनांहून अधिक सोन्याची आयात करतो, हेही किमती वाढण्यामागील महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.

बाजारतज्ज्ञांच्या मते, ईटीएफमधील गुंतवणुकीमुळे दिवाळी 2026 पर्यंत सोन्याचा दर 1.62 ते 1.82 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे बाबा वेंगांचं भाकीत प्रत्यक्षात उतरत असल्याचं चित्र काही अंशी दिसून येत आहे.

दरम्यान, चांदीच्या बाजारातही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सध्या चांदीचा दर सुमारे 1.25 लाख रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतींमध्ये जवळपास 9 टक्क्यांची वाढ झाली होती. एका टप्प्यावर चांदीने प्रति किलो 4 लाख 20 हजार 48 रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर दर घसरून 3 लाख 99 हजार 893 रुपये इतका झाला.

त्याच दिवशी सोन्याच्या किमतीतही सुमारे 9 टक्क्यांची वाढ झाली होती. सोनं प्रति 10 ग्रॅम 1 लाख 80 हजार 779 रुपये या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलं होतं, नंतर एमसीएक्सवर ते 1 लाख 69 हजार 403 रुपयांवर स्थिरावलं.

या पार्श्वभूमीवर येत्या काळात सोने आणि चांदी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील, असं मत बाजारतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाबा वेंगांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

5 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

6 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

6 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

10 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

10 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

13 तास ago